शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कळवा उड्डाणपुलाचा ११० टनाचा लोखंडी सांगाडा १४ मीटर उंच बसविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन ...

ठळक मुद्दे चार तासांमध्ये पार पडली मोहीम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन उड्डाणपुलावरील १०० मीटर तसेच ११०० टनाचा मुख्य सांगाडा अवघ्या चार तासांमध्ये बसविण्यात ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना यश आले आहे. हा सांगाडा बसविल्यामुळे कळवा उड्डाणपूलाच्या कामाला वेग आला असून लवकरच दुसऱ्या टप्याचे कामही पुढील आठवडयामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे तसेच ठाणे बेलापूर मार्गे जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. तो जुना तसेच धोकादायक सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीला बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी १९९५- ९६ च्या दरम्यान बांधलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. ठाणे शहरातील वाहन संख्याही मोठया प्रमाणात वाढली. त्यामुळे या एकाच पुलावर वाहतूकीचा ताण येऊन मोठया प्रमाणात कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी या नवीन पूलाची उभारणी करण्यात येत आहे.गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पूलाच्या खाडीवरील ११०० टनाचा लोखंडी सांगाडा बसविण्यास सुरुवात झाली. यावेळी लॉचींगसाठी बसविलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मेट्रिक टन आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान, हा सांगाडा बसविण्याचे काम मोठया कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या स्पॅन फॅब्रीकेशनचे काम दमणच्या पी.एस.एल.कंपनीमध्ये झाले असून यासाठी वापरलेले विशिष्ट प्रकारचे टेन्शन रॉड हे परदेशातून आयात केले आहेत. हा सांगाडा बसवण्यात आल्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये हा सांगाडा १०८ मीटर जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

‘गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरीत्या झाल्यामुळे सप्टेंबर अखेर हा उड्डाणपूल सुरु होईल. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी होणार वाहतूक कोंडी दूर होण्यास आता मोठी मदत होईल.’- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.................

तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांचे खरे आभार मानायला हवे. त्यांच्या काळात पाठपुरावा करण्यात आला असून एक स्वप्न पूर्ण होत आहे. दोन शहरांना जोडणारे हे मोठे प्रकल्प आहेत त्यामुळे अवजड वाहने कळव्यात उतरता नवी मुंबईच्या हद्दीत पटनीला उतरण्याची सूचना मी केली आहे.- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री. 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका