शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कळवा उड्डाणपुलाचा ११० टनाचा लोखंडी सांगाडा १४ मीटर उंच बसविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन ...

ठळक मुद्दे चार तासांमध्ये पार पडली मोहीम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन उड्डाणपुलावरील १०० मीटर तसेच ११०० टनाचा मुख्य सांगाडा अवघ्या चार तासांमध्ये बसविण्यात ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना यश आले आहे. हा सांगाडा बसविल्यामुळे कळवा उड्डाणपूलाच्या कामाला वेग आला असून लवकरच दुसऱ्या टप्याचे कामही पुढील आठवडयामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे तसेच ठाणे बेलापूर मार्गे जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. तो जुना तसेच धोकादायक सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीला बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी १९९५- ९६ च्या दरम्यान बांधलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. ठाणे शहरातील वाहन संख्याही मोठया प्रमाणात वाढली. त्यामुळे या एकाच पुलावर वाहतूकीचा ताण येऊन मोठया प्रमाणात कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी या नवीन पूलाची उभारणी करण्यात येत आहे.गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पूलाच्या खाडीवरील ११०० टनाचा लोखंडी सांगाडा बसविण्यास सुरुवात झाली. यावेळी लॉचींगसाठी बसविलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मेट्रिक टन आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान, हा सांगाडा बसविण्याचे काम मोठया कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या स्पॅन फॅब्रीकेशनचे काम दमणच्या पी.एस.एल.कंपनीमध्ये झाले असून यासाठी वापरलेले विशिष्ट प्रकारचे टेन्शन रॉड हे परदेशातून आयात केले आहेत. हा सांगाडा बसवण्यात आल्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये हा सांगाडा १०८ मीटर जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

‘गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरीत्या झाल्यामुळे सप्टेंबर अखेर हा उड्डाणपूल सुरु होईल. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी होणार वाहतूक कोंडी दूर होण्यास आता मोठी मदत होईल.’- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.................

तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांचे खरे आभार मानायला हवे. त्यांच्या काळात पाठपुरावा करण्यात आला असून एक स्वप्न पूर्ण होत आहे. दोन शहरांना जोडणारे हे मोठे प्रकल्प आहेत त्यामुळे अवजड वाहने कळव्यात उतरता नवी मुंबईच्या हद्दीत पटनीला उतरण्याची सूचना मी केली आहे.- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री. 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका