शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कंत्राटी कामगारांना उपदान, राज्यातील पहिली महानगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 21:51 IST

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली.

ठळक मुद्देश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली.

मीरा रोड - कंत्राटी कामगारांना किमान वेतन पाठोपाठ उपदान देणारी मीरा भाईंदर ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. कंत्राटी सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या १८० जणांना उपदानचा धनादेश आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते देण्यात आला. ड वर्गातील महापालिका असून देखील मीरा-भाईंदर महापालिकेने कंत्राटी सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन पासून उपदान दिल्याने पालिकेचे कौतुक होत आहे. राज्यभरातील अनेक महानगरपालिका नगरपरिषदा आदि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेल्या किमान वेतनापासून अनेक भत्ते, सुविधा उपदान दिले जात नाही. कंत्राटी कामगारांची पिळवणूक केली जाते . मीरा-भाईंदर महापालिकेत देखील सुमारे दीड हजार कंत्राटी कामगारांना किमान वेतनापासून उपदान आदी दिले जात नव्हते.  

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली. कामगार आयुक्तांना पासून शासन दरबारी दाद मागण्यात आली. काम बंद आंदोलन केले गेले. त्यातूनच कंत्राटी कामगारांच्या हक्काचे किमान वेतन देण्यास सुरुवात झाली. पुढे  किमान वेतन सह बोनस, सुट्टीचा पगार  पि.एफ.,  ई.एस.आय.सी. हे सर्व कंत्राटी सफाई कामगार यांना पालिकेने दिले. 

परंतु कंत्राटी सफाई कामगार निवृत्त झाल्यावर अथवा त्याचा सेवे दरम्यान मृत्यू झाल्यावर उपदान मिळणे कायद्याने हक्क असताना तो मात्र दिला जात नव्हता. उपदान देण्यास ठेकेदाराने आपली जबाबदारी झटकली तर महापालिकेने ठेकेदारची जबाबदारी असल्याचे सांगून हात वर केले होते. उपदान द्यावे लागू नये यासाठी साफसफाईचा ठेका चार वर्षाच्या मुदतीचा देण्याचा निर्णय घेतला व तशा निविदासुद्धा काढण्यात आल्या. परंतु श्रमजीवी संघटनेने मतदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पालिकेने कंत्राटी सफाई कामगारांना उपदान देण्यास मान्यता दिली. शुक्रवार २५ जून रोजी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते लाभार्थी कंत्राटी सफाई कामगार कमलाकर जनार्दन म्हात्रे यांना धनादेश देण्यात आला. यावेळी विवेक पंडित, उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे, संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, उप जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, सरचिटणीस इरफान शेख आदी उपस्थित होते.

प्रत्येक कामगारास 55 ते 60 हजार मिळणार

सेवा निवृत्त आणि मयत अश्या १८० कंत्राटी कामगार ना उपदानचे धनादेश दिले जात आहेत. प्रत्येक कामगारास सुमारे ५५ ते ६० हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी पालिकेचे १ कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतनापासून विविध भत्ते, उपदान आदि मंजुरीसाठी उपायुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे यांनी महत्वाची भूमिका निभावली. अनेक मोठ्या महापालिका किमान वेतन देत नसताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र कायद्याने देय सर्व काही या कंत्राटी कामगारांना दिले आहे. कंत्राटी कामगारांनी सुद्धा चांगले काम करून सतत ३ वेळा स्वच्छतेचा पुरस्कार पालिकेला मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे पंडित म्हणाले.  सर्व कामगार एकत्र राहिले म्हणुन आज एवढी मोठी मजल मारता आली. असेच एकत्र राहिलात तर नक्कीच एक दिवस समान काम समान वेतन सुध्दा मिळवू अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली. 

आयुक्त दिलीप ढोले यांनी निवृत्त कंत्राटी सफाई कामगार यांना शुभेच्छा देताना महापालिकेने आर्थिक भार किती पडेल याचा विचार न करता सफाई कामगार यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे कामगारांनी सुद्धा आपले शहर, आपली महापालिका समजून चांगले प्रभावीपणे काम करावे. शहर स्वच्छ, सुंदर राहील हे ध्येय ठेवावे असे आवाहन केले.  

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरMuncipal Corporationनगर पालिका