शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

उपकेंद्रातील विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:29 IST

Education News : ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही.

ठाणे - मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील विधी आणि न्याय शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून गुणपत्रिकाच दिली नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नाहीत. या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत गुणपत्रिका न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला आहे.ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही. केवळ सूचनाफलकावर निकाल जाहीर केला जातो. मात्र, हा निकाल जाहीर करताना कोणाला एटीकेटी लागली आहे, याची नोंद केली जात नसल्याने पुन:तपासणीसाठी अनेक विद्यार्थ्यांकडून ९९९ रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण झाले असल्याचे समजते. यातून मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नसतो. उपकेंद्राच्या समन्वयक म्हणून राऊत नावाच्या एक अधिकारी आहेत. मात्र, त्यादेखील तेथे उपस्थित नसतात. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असूनही स्वतंत्र फॅकल्टीची निर्मिती न करता तात्पुरत्या कारभारावर हे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे चार वर्षांच्या परीक्षा देऊनही गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थी वकिलीची सनदही मिळवू शकले नसल्याचे खामकर यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांशी साधला संवादnविक्रम खामकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा पल्लवी जगताप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या बाळकुम येथील उपकेंद्राला भेट दिली. nयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता हा प्रकार उघडकीस आला. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनाही ही बाब सांगितलेली असून १५ दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिल्या नाही, तर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खामकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण