शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:18 IST

पालिका प्रशासन उदासीन : खासगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नाही

भार्इंदर : गेल्या २०१२ पासून मीरा-भार्इंदर महापालिकेने शिक्षण विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, आजही बहुतांश खाजगी शाळांत ही यंत्रणाच बसवली नसल्याचे उघड झाले असून ती बसवण्यासाठी पालिका अपघाताची वाट पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.पालिका क्षेत्रात सुमारे चारशेहून अधिक खाजगी शाळा आहेत. त्यात २३२ प्राथमिक, १२५ माध्यमिक, बारावीपर्यंतच्या खाजगी शाळांची संख्या ४५ व १२ महाविद्यालये व दोन तंत्र महाविद्यालयांचा समावेश आहे. २०१२ मध्ये मंत्रालयातील आगीच्या घटनेनंतर शहरातील खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला. प्रशासनाने अग्निशमन विभागाला सर्व खाजगी शाळांचे फायर आॅडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या खाजगी शाळा सोडल्यास बहुतांश शाळांत अग्निरोधक यंत्रणाच बसवली नसल्याचे समोर आले. त्यांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्याची सक्ती करण्यासाठी अग्निशमन विभागाने त्या शाळांचा पाणीपुरवठाच खंडित करण्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाला दिले.केवळ कागदी घोडे नाचवण्याखेरीज पालिकेने ठोस कार्यवाही न केल्याने आजही बहुतांश खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणाच नाही. काही शाळांनी केवळ अग्निरोधक सिलिंडर बसवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील कित्येक खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत नसून त्या रहिवासी इमारतीत सुरू आहेत.खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत असाव्यात, यासाठी राज्य सरकारने अनेकदा नियम केले, तर पालिकेनेदेखील त्यावर ऊहापोह केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून आजही रहिवासी इमारतीत शाळा सुरूच आहेत. अशा इमारतीतील शाळांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात अडचण होत असल्याने त्यांनी केवळ अग्निरोधक सिलिंडरवरच आपली सुरक्षा मर्यादित ठेवली आहे. त्यातच सिलिंडरची संख्याही पुरेशीनाही.पालिकेनेही आपल्या अखत्यारीतील ३५ शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही खाजगी शाळा अशा अडगळीच्या ठिकाणी आहेत की, तेथे एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणेला बचावकार्यात अडथळा येऊ शकतो. यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने शाळा व्यवस्थापनानेसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले.मोठ्या व स्वतंत्र इमारत असलेल्या खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. रहिवासी इमारतीमधील खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवण्यात आले आहेत. यानंतरही ज्या शाळांनी अग्निरोधक यंत्रणा बसवलेली नाही, त्याचा आढावा घेऊन ती यंत्रणा बसवण्यासाठी कार्यवाही केली जाईल.-दीपक पुजारी, उपायुक्त, अग्निशमन विभागदोन वर्षांपूर्वी सुमारे ७० खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचे उघड झाले होते. त्यांना सतत नोटीस बजावून ती यंत्रणा बसवण्यास भाग पाडले. काही शाळांनी तीबसवली नसल्यास त्यांना विभागप्रमुखांमार्फत नोटीस पाठवून ती बसवण्याची कार्यवाही पुन्हा सुरू केली जाईल.- सुरेश देशमुख, सहायक अधिकारी, शिक्षण विभाग

टॅग्स :Schoolशाळा