शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमधील महाविद्यालयांत विद्यार्थी उपस्थिती 10 टक्केच; कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:15 IST

कोरोनाची भीती कायम : बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना फटका

स्नेहा पावसकरठाणे : राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. मात्र, या सगळ्या महाविद्यालयांत मिळून विद्यार्थ्यांची १० टक्केच उपस्थिती दिसते. आठवडा संपत आला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कायम असल्याचे जाणवते आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत होता हे लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू झाली. महापालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात  आला. 

ग्रामीण भागातील शाळा, महाविदयालये सुरू करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातही महापालिका, नगरपरिषदांचा भाग वगळता उर्वरित ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भातसानगर, कल्याणचा काही ग्रामीण भाग येथील मिळून सुमारे १४ ते १५ महाविद्यालये आहेत. ही जवळपास सर्वच महाविद्यालये सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची अवघी १० टक्के उपस्थिती होती.  महाविद्यालयात स`निटायझर, मास्कचा वापर बंधनकारक आहे. त्याचे विद्यार्थीही पालन करत आहे. मात्र गेल्या आठ दिवसात महाविद्यालयातील उपस्थिती वाढलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे