शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

By अजित मांडके | Updated: February 28, 2024 20:39 IST

आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज त्यांचे गोडवे गट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशिर्वाद पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? त्यामुळे आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

विधिमंडळात प्रतिक्रिया देताना, शरद पवार यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहते, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याचा खरपूस निरोप राष्ट्रवादी (अजित पवार) गत्चे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी घेतला.  शरद पवार यांच्या आशीर्वादाने, सहमतीने २०१४ साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता. याला काय म्हणायचे ? २०१६ साली, २०१८ साली, २०१९ साली अनेक बैठका भाजपच्या शिर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने व आशिर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचे ? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली, त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत २०१९ मध्ये सामील झाले. मग याला काय म्हणायचे? पवारसाहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की, तो साहेबांचा आशिर्वाद पण एक वेगळी राजकीय भूमिका अजित पवार यांनी घेतली की ती गद्दारी ? जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे, अशी प्रश्नांची सरबत्ती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.

कळव्याची शिवसेनेची शाखा असेल, खारीगाव ची शिवसेनेची शाखा असेल, या शाखा कोणामुळे तुटल्या? हे बहुतेक जितेंद्र आव्हाड विसरले असतील. ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. निवडणूक आयोगासमोर दोनतीन महिने सुनावणी झाली त्याच्यानंतर पक्ष व चिन्ह याचा निर्णय आमच्या बाजूने मिळाला, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला, चिन्ह दिले. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमच्या बाजुने निर्णय दिला. तसेच आमच्यामध्ये तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नसल्याचे देखील परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड