शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज गोडवे गात आहे; आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

By अजित मांडके | Updated: February 28, 2024 20:39 IST

आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध करणारे आज त्यांचे गोडवे गट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशिर्वाद पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? त्यामुळे आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय असा सवाल देखील परांजपे यांनी उपस्थित केला. 

विधिमंडळात प्रतिक्रिया देताना, शरद पवार यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहते, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याचा खरपूस निरोप राष्ट्रवादी (अजित पवार) गत्चे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी घेतला.  शरद पवार यांच्या आशीर्वादाने, सहमतीने २०१४ साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता. याला काय म्हणायचे ? २०१६ साली, २०१८ साली, २०१९ साली अनेक बैठका भाजपच्या शिर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने व आशिर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचे ? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली, त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत २०१९ मध्ये सामील झाले. मग याला काय म्हणायचे? पवारसाहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की, तो साहेबांचा आशिर्वाद पण एक वेगळी राजकीय भूमिका अजित पवार यांनी घेतली की ती गद्दारी ? जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे, अशी प्रश्नांची सरबत्ती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.

कळव्याची शिवसेनेची शाखा असेल, खारीगाव ची शिवसेनेची शाखा असेल, या शाखा कोणामुळे तुटल्या? हे बहुतेक जितेंद्र आव्हाड विसरले असतील. ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. निवडणूक आयोगासमोर दोनतीन महिने सुनावणी झाली त्याच्यानंतर पक्ष व चिन्ह याचा निर्णय आमच्या बाजूने मिळाला, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला, चिन्ह दिले. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमच्या बाजुने निर्णय दिला. तसेच आमच्यामध्ये तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नसल्याचे देखील परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड