शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बदलापूरमध्ये फेरीवाल्यांवर होणार धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:07 IST

बैठकीत झाला निर्णय : बेकायदा पार्किंग समस्याही निकाली निघणार

बदलापूर : स्टेशन परिसरात वाहतूककोंडीला जबाबदार असलेल्या फेरीवाल्यांवर आणि बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचे संकेत नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी दिले आहेत. फेरीवाला आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत जाधव यांनी कारवाईचे संकेत दिले. तसेच कारवाईला अडथळा येऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बदलापूरमध्ये रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बदलापूर पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अ‍ॅड. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन, फेरीवाले, रिक्षा संघटना आणि लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेण्यात आली. बदलापूर रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून होम प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रेल्वेतर्फे जागा अधिग्रहण करण्यात आली. त्या जागेवर रिक्षाथांबे, व्हॅन, फेरीवाल्यांचे बस्तान होते. होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू होण्यापूर्वी आमदार किसन कथोरे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण, नगराध्यक्ष जाधव, भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आदींनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत काही रिक्षाथांबे पुढील जागा निश्चित होईपर्यंत रस्त्याच्या कडेला एकेरी रांगेत थांबतील, असे ठरले होते. तसेच बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांवर कारवाई करत रस्ता मोकळा ठेवला जाईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर रिक्षाथांबे रस्त्यावर आले आहेत. तर, व्हॅन रस्त्याच्या दुसºया बाजूला उभ्या केल्या जातात. त्यातच बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढत होते. त्यामुळे बदलापूर स्थानकाबाहेरच्या या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर मोठी अवजड वाहने, राज्य परिवहन आणि भाजीपाल्याचे ट्रक आल्यास वाहतूककोंडी होते. तर, रिक्षाचालकांकडून दुहेरी रांग लावली जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे तर वाहनचालकांना स्थानक परिसरातून वाहन घेऊन जाणे अशक्य होते.गेल्या काही दिवसांपासून या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे ही बैठक झाली. या बैठकीत जुन्याच निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे ठरवण्यात आले. रिक्षा, फेरीवाले आणि व्यापाºयांनी ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे पालिकेला व लोकप्रतिनिधींना आश्वासन दिले आहे. बेकायदा पार्किंगवर तसेच अतिक्र मण आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.बदलापूर पश्चिमेकडे स्थानकाशेजारून होणारी अवजड वाहतूक बेलवली येथील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून वळवून गणेश चौक, हेंद्रेपाडा, चर्च रोडमार्गे बदलापूर गावाकडे जाईल. तसेच भाजीपाला घेऊन येणारे ट्रक सकाळी ९ नंतर स्थानक परिसरात येणार नाहीत. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. व्यापाºयांनी दुकानाबाहेर लावलेल्या जाळ्या काढून टाकणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, पालिकेने तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी बदलापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई कराजे बेकायदा रिक्षा चालवून नियम मोेडत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रिक्षा संघटनेच्याच पदाधिकाºयांनी बैठकीत केली आहे. या बैठकीला वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, किरण वाघ, सुरेश जावडेकर, नगरसेवक चेतन धुळे, सूरदास पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :badlapurबदलापूरShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबई