शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
3
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
4
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
5
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
6
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
7
"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह
8
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
9
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक
10
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
11
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
12
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
13
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
14
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
15
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
16
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
17
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
18
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
19
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
20
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या हेतूलाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:20 AM

अभाविपने वेधले लक्ष : शैैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

- जान्हवी मोर्येडोंबिवली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईतील विद्यापीठात जावे लागू नये, यासाठी विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राच्या उद्घाटनानंतरही येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सोय अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे उपकेंद्राच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे.विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ ११ जुलैला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. ‘स्कूल आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस’ या अभ्यास शाखेची सुरुवात येथे केली जाणार आहे. या उपकेंद्रात एम.टेक इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, एम.टेक इन केमिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, एम.टेक इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, एम.टेक इन आर्टिफि शिअल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड मशीन लर्निंग, मास्टर इन ओशोनोग्राफी, पीएच.डी. इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, पीएच.डी. इन केमिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा मुंबईलाच धाव घ्यावी लागणार आहे, याकडे विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे. विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. मात्र, तरीही उपकेंद्रातून खरा उद्देश साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात निषेधाच्या घोषणा देत कुलगुरूंसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता.विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची कार्यशीलता वाढवणे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, जेणेकरून ठाणे-पालघर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईत वारंवार जावे लागणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.महाविद्यालयात तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाइनची सुविधा व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१५ मध्ये सुचवलेली ‘चॉइस बेस क्रेडिट सिस्टीम’ परिणामकारकरीत्या विद्यापीठात लागू करावी, यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अभाविपचे डोंबिवलीतील कार्यकर्ते मिहीर देसाई यांनी दिली.लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ - विद्यापीठविद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा पुरविण्याच्या सक्षमीकरणाचे काम विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे, प्रवेश अर्ज उपलब्ध करून देणे हे काम आॅनलाइनद्वारे केले जाते. निकाल महाविद्यालयांना पाठविले जातात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे काही गरज लागेल ते लवकरात लवकर मिळेल असे पाहू. ठाण्यात ही सेवा उपलब्ध आहे. कल्याणला ही लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ, अशी माहिती उपकुलसचिव व विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ