शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अजबच की... एकही किमी न धावलेल्या घंटा गाडी दुरुस्तीसाठी 1 कोटी 6 लाखांची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:52 IST

एकही किलोमीटर न चाललेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळण कशाला , काँग्रेस नगरसेवकांचा सवाल

ठळक मुद्देशहरातील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी पालिकेने तब्बल ५० घंटागाड्या मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात खरेदी केल्या आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी - भ्रष्टाचार व स्वच्छतेच्या अभावासह शहरात मूलभूत समस्या पुरविण्यास अपयश येत असल्याने सतत चर्चेत असलेली भिवंडी महापालिका नव्या घंटा गाड्या खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता, याच नव्या घंटा गाड्या रस्त्यावर एकही किलोमीटर न चालता या नव्या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपये किंमतीची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे नव्या घंटा गाड्या खरेदी करून त्या एकही किलोमीटर शहरात धावल्या नसतांनाही या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी कोटींची निविदा काढल्याने काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत या निविदेसह मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहे.                

शहरातील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी पालिकेने तब्बल ५० घंटागाड्या मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात खरेदी केल्या आहेत. सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये खर्च करून या नव्या कोऱ्या घंटा गाड्या मनपा प्रशासनाने खरेदी केले आहेत. या गाड्यांना खरेदी करून आज वर्ष उलटूनही या घंटागाड्या वापरात न आल्याने कोंबडपाडा येथील भांडारगृहात धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये खर्च करून ५० घंटा गाड्या खरेदी केल्या असतांनाही मागील वर्षभरापासून नव्या घंटा गाड्या धूळखात ठेऊन घंटा गाडीच्या खासगी ठेकेदारांवर मनपा प्रशासन कोटींची उधळण होत आहे. तर या घंटागाड्यांवर चालक व इतर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या घंटागाड्या जागीच उभ्या असल्याचा निर्वाळा भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र आता एकही किलोमीटर न धावलेल्या या नव्या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्थीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेला काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी आक्षेप घेतला असून ज्या नव्या गाड्या रस्त्यावर धावल्याच नाहीत त्यांच्यावर दुरुस्थीसाठी कोटींची उधळण कशाला असा सवाल देखील नगरसेवक राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

विशेष म्हणजे महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात ५० नव्या घंटा गाड्या खरेदी केल्या असून त्यांच्या दुरुस्थीसाठीची निविदा सप्टेंबर महिन्यात काढण्यात आली आहे म्हणजे घंटा गाड्या खंगारदी करण्याच्या अगोदरच दुरुस्थीची निविदा काढण्यामागे व नव्या घंटा गाड्या इतक्या दिवस धूळ खात उभ्या ठेवण्यामागचे नेमकी गणित काय असा सवाल देखील काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी मनपा आयुक्तांनाकडे लेखी निवेदनाद्वारे विचारला आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या आक्षेपामुळे भिवंडी महापालिकेचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

दरम्यान ५० घंटा गाड्यांसाठी एकूण तीन निविदा मनपाने काढल्या असून एक निविदा वाहन चालक भर्तीसाठीची असून सदर विषय स्थायी समितीकडे प्रलंबित आहे, दुसरी निविदा या गद्यामध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीआरएस सिस्टीम साठी आहे, तर तिसरी निविदा देखभाल दुरुस्तीसाठी असून या घंटा गाड्या जेव्हा रस्त्यावर धावणार, त्यावेळी जर त्यांना काही अपघात व दुरुस्तीचे करण्याची वेळ आली तर त्यासाठी पाच वर्षांसाठी ही निगा व देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. आता, उभ्या असलेल्या घंटागाड्यांच्या दुरुस्तीसाठी हि निविदा काढली नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिकाcongressकाँग्रेस