शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

मोखाड्यात पाणी अडवा आणी पैसे जिरवा

By admin | Updated: November 25, 2015 01:33 IST

आदीवासीची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, गुरां ढोंराना प्यायला पाणी मिळावे व पाणी अडवा पाणी जिरवा यातून भूजल पातळी वाढावी हे ध्येय डोळ्या समोर ठेवून बंधारे

मोखाडा : आदीवासीची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, गुरां ढोंराना प्यायला पाणी मिळावे व पाणी अडवा पाणी जिरवा यातून भूजल पातळी वाढावी हे ध्येय डोळ्या समोर ठेवून बंधारे बांधले गेले असले तरी अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे पाणी अडवा आणि पैसे जिरवा हिच संकल्पना तालुक्यात राबवली गेली असल्याचे चित्र या बंधाऱ्याकडे बघितल्यास दिसून येत आहेजिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने तालुक्यात सन २०१२-१३ ते २०१४-१५ च्या दरम्यान ३ कोटी १९ लाख ६६ हजार रुपये खर्चून तालुक्यातील गावपाड्यात २० बंधारे बांधले आहेत.परंतु शासनाने या बंधाऱ्यासाठी करोडोंचा खर्च करून देखील मूळ उद्देश साध्य झालेला नाही? यामुळे लघुपाटबंधारे विभागाचा करोडोंचा खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसते.याबाबत अधिक माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनेक प्रश्न उपस्थित करून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे यामुळे यांची पाळेमुळे आणखी खोलात असून निकृष्ट कामे करून जनतेचा व शासनाचा पैसा हडप करणारी टोळीच सक्रिय झाली असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे कारण आज घडीला काही मोजके बंधारे सोडले, तर अनेक बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पाहयला मिळत नाही. निकृष्ट बांधकामामुळे बंधाऱ्यांना गळती लागली आहे. तसेच अनेक बंधारे अपूर्ण आहेत. त्याचबरोबर या विभागाची कामे सुद्धा अंदाजपत्रक नियमावली नुसार केलीच जात नाहीत. दुरुस्तीची कामे ही थातुर मातूरच होतात केवळ लांखोचा खर्च कागदी घोडयावरच नाचवला जातोय.तर दुसरीकडे मात्र दरवर्षी लाखो रुपयांचे नविन बंधारे मंजूर करून बांधने जात आहेत यामुळे विकास कामाच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे काम सुरु असताना लगतच्या गावपाड्यातील आदीवासी बांधवाची येथे कामाच्या ठिकाणी नेहमीच रहदारी असायची यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे? ...याबाबत अनेक तक्रारी येथील आदिवासींनी लोकमत शी बोलतांना सांगितल्या यावरुन या बंधाऱ्यांच्या बांधकामाकडे बघितल्यास लाखोंचा खर्च झाला तरी कुठे असा प्रश्न आहे ? तसेच वन विभागाकडून १० एकर जमीन विकास कामासाठी देण्याची तरतूद असताना काम थांबण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवतोय कुठे? त्याचबरोबर प्रत्यक्षरीत्या कामाच्या ठिकाणाची पाहणी करुन कामाला सुरुवात केली जात असताना, पुन्हा बजेट वाढवण्यासाठी नवीन सुधारीत अंदाजपत्रक का बनवावे लागते किंवा असे असताना याचे शहाणपण अगोदरच का नाही सुचले असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असूून हे काम बंद असल्याने अनेक कारणांची खैरात करणाऱ्या प्रशासनाला विचारले जात आहेत.तसेच या बंधाऱ्यांवर लाखोंचा खर्च होऊन देखील याचा काहीएक फायदा आदीवासी बांधवाना झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असून याची वरीष्ठ पातळीवरुन चौकशीची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)पेंडकवाडी येथील बंधाऱ्याचे बांधकाम थांबवलेल आहे तसेच हे काम वनविभागच्या जागेत असल्याने मध्यंतरी वन विभागाकडून या कामाबाबत अडकाठी करण्यात आली होती व या कामाचे बजेट मोठे असल्याने याचे नवीन सुधारीत अंदाजपत्रक तयार करून नंतर काम सुरू केले जाईल - सचिन खंबाईत, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग मोखाडाया बंधाऱ्याचे काम चालू असताना मी अनेक वेळा या कामाच्या ठिकाणी उपस्थित असायचो जास्तीत जास्त दगडी गोट्यांचा वापर करून कसे बसे थातुर माथूर काम करून फक्त या कामाची सुरुवात करून अर्धवट ठेवलेले आहे. यामुळे यांचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही तसेच याबाबत आम्ही ग्रामसभेत तक्रार करणार असून यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी- रामदास बरफ, पेंडकवाडी येथील रहिवासी