शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यातील वाचक कट्टयावर "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 15:22 IST

वाचक कट्टय़ातर्फे ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचे अभिवाचन संपन्न झाले. 

ठळक मुद्देवाचक कट्टयावर "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन यंदाचा हा २० क्रमांकाचा कट्टा होता. तरुण साहित्यिक सुमेध समर्थ याने केले अभिवाचन

ठाणे : वाचन संस्कृतीचा होत जाणारा ह्रास लक्ष्यात घेता अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी वाचन संस्कृती टिकून रहावी म्हणून वाचक कट्ट्याची निर्मिती केली. वाचक कट्टयावर तरुण साहित्यिक सुमेध समर्थ याने "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन करत रसिकांची मने जिंकली. यंदाचा हा २० क्रमांकाचा कट्टा होता. 

     लघुकथाकार दिगंबर कृष्ण मोकाशी यांची हि कथा आहे. या कथेचे वाचन करताना सुमेधने एक गाव,त्या गावात तुफान पडणारा पाऊस,पूर,पुरात वाहून गेलेला रामजीचा तरुण छोकरा, सन्तु वाण्याचे दुकान,ज्ञानेश्वरी वाचणारे जोशी,शिवा नेमाणेची कष्टाळू बायको आणि गोठ्यात वासारामुळे अडलेली गाय तसेच या सगळ्यांना जोडते ती ज्ञानेश्वरी मधलं ज्ञान अज्ञान भेद प्रकरणं इत्यादी गोष्टी या कथेत मांडण्यात आल्या. स्वराली दामले हि ने सहकलाकार म्हणून काम केले.स्वरालीने आपल्या सुमधूर आवाजात पसायदान सादर करत कार्यक्रमास अध्यात्म्याची जोड दिली. हा कार्यक्रम ऐकत असताना आम्ही कथा ऐकतोय असे वाटत नसून,आम्ही प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणीच आहोत की काय असे जाणवले, असे एका प्रक्षकाने सांगितले. यावेळी शुभांगी भालेकर,मौसमी घाणेकर,वैभव चव्हाण,ओमकार मराठे,धनेश चव्हाण,कुंदन भोसले,उत्तम ठाकूर,माधुरी कोळी, अमित महाजन, सहदेव कोळंबकर,न्यूतन लंके,साक्षी महाडिक या कट्ट्याच्या कलाकारांनी देखील अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे निवेदन आरती ताथवडकर यांनी केले.दिपप्रज्वलन अनुराधा नामजोशी यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई