शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अंगणवाडीचे निकृष्ट काम बंद

By admin | Updated: June 9, 2014 00:20 IST

बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला

नायगाव : बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला. वसईतील अर्नाळा येथे मात्र या अंगणवाडी बांधणीचा पायाच कमकुवत झाल्याने सदर अंगणवाड्यांची बांधकामे किती काळ टिकतील याबाबत शंका आहे. अर्नाळ्यातील असाच निकृष्ट बांधकामाचा ग्रामस्थांनी चांगलाच समाचार घेत हे काम बंद पाडले.अर्नाळा ग्रा. पं. हद्दीतील विविध ठिकाणी ३ अंगणवाड्या मंजूर झाल्या. त्यासाठी १८ लाख रू. चा निधीही पुरवण्यात आला, मात्र बच्यावपाडा येथे उभी राहणारी अंगणवाडीची वास्तु स्थानिकांनी बंद पाडली. बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून लोखंडी सळ्या गंजलेल्या स्थितीतच वापरण्यात येत असल्याचा स्थानिकांनी यावेळी आरोप केला. कंत्राटदाराला तुर्तास हे काम थांबवण्यास भाग पाडले आहे. परंतु पुढे काय? पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यातच उशिराने सुरू झालेल्या या कामाच्या मजबुतीबाबत शंका आहेत. यापुर्वी रहिवाशांपैकी एखाद्या घरात अंगणवाडी भरवली जायची, मात्र आता स्वतंत्र नव्याने अंगणवाड्या उभ्या राहणार असल्याने स्थानिकांत समाधान होते.या विकासकामात निकृष्ट साहित्य वापरून कंत्राटदार स्वत:चा फायदा करून घेणार आहेत, मात्र अशा स्वरूपाच्या वास्तु किती काळ टिकतील याबाबत शंका असल्याने दु्रतगतीने सुरू असलेले हे बांधकाम रहिवाशांनी बंद पाडले. प्रतिकुल घटकांचे निराकरण होऊन ३ वर्षाखालील बालकांचे संवर्धन व्हावे, म्हणून केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणली. त्याचे फायदे स्थानिकांना मिळण्यापुर्वीच थेट बांधकामातच गोंधळ असल्याने योजनांवर प्रश्नचिन्ह असल्याने स्थानिक आक्रमक आहेत. (वार्ताहर)