शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सरकारविरोधात उद्या अन्न अधिकार अभियान करणार राज्यभर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 19:37 IST

- सुरेश लोखंडेठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अधिकार अभियानाने राज्यभर गुरूवारी निदर्शने करण्याचे निश्चित झाले आहे. दोनच सदस्य असणा-या अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशन ...

- सुरेश लोखंडे

ठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अधिकार अभियानाने राज्यभर गुरूवारी निदर्शने करण्याचे निश्चित झाले आहे.

 दोनच सदस्य असणा-या अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशन कार्ड आता रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकण्यात येणार आहे. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणशी पाच किलो धान्य मिळते तर अंत्योदय लाभार्थीना कितीही सदस्य असले तरी ३५ किलो धान्य मिळते. कारण अंत्योदय कुटुंबे सर्वात गरीब आहेत. आदिम जमाती उदा. कातकरी कोलाम, किंवा विधवा/ परित्यक्ता कुटुंबप्रमुख असणारी , दुर्धर आजाराने ग्रस्त असणा-या कुटुंबप्रमुखाचे कुटुंब इ. त्यामधे मोडतात. बहुधा व्रुद्ध पती पत्नी अथवा एकल स्त्रिया व त्यांचे एखादे मुल असणारीच कुटुंबे दोन सदस्य असणारी असतात.( हे निकष सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहेत.) त्यांचे ३५ किलो धान्य आता सबका साथ सबका विकास म्हणणा-या सरकारला डोळ्यात सलू लागले आहे. २१ सप्टेंबरला प्रधान सचिवांनी आदेश काढून सदर कार्डे रद्द करण्यास सांगण्यात आले आहे व पाच माणसांपेक्षा जास्त सदस्य संख्या असणा-या प्राधान्य गटातील कुटुंबांची कार्डे रद्द करून त्यांना अंत्योदय मधे घालावे असेही हा आदेश म्हणतो. हा सगळा तुघलकी कारभार सर्वात गरीब जनतेच्या ताटातले अन्न काढून घेणारा असल्याच्या आरोपा खाली ठाणेसह राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

प्रधान सचिवांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणारा असल्याचा आरोप आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशनवरील साखर देखील बंद करण्यात आली आहे. ती फक्त अंत्योदय कुटुंबांना एकच किलो, ती देखील वाढीव दराने मिळणार आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश छत्तीसगडसारखी राज्ये रेशनवर डाळ, तेल , आटा व अन्य वस्तू देखील देतात पण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी भर घाल ण्याचा दावा करणारे संपन्न महाराष्ट्र राज्य व येथील सरकार सर्वात गरीब कुटुंबांसाठी ही नादानी करते याचा आम्ही तीव्र निषेध  अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानचे संजीव साने, स्वराज इंडियाचे, उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर यांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात दि. १२ ऑक्टोबरला हा निषेध करण्यात येणार आहे.

कोल्हापूर सांगली, नागपुर, पुणे, नंदुरबार, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई , पालघर,अमरावती, रायगड, ठाणे सहित महाराष्ट्रातील विविध ठिकाणी  आंदोलन होणार  आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते दुपारी  ५ वाजता निदर्शन केले जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणे