शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डोंबिवलीकरांची केली राज्यमंत्र्यांनी फसवणूक;  मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:13 IST

वेदपाठशाळेचा बेकायदेशीरपणे घातला घाट

डोंबिवली : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे ४५६ कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या काही कामांचे भूमिपूजन आणि वेदपाठशाळेच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप मनसेने केला आहे. चव्हाण यांनीडोंबिवलीकरांची फसवणूक केली असून त्यांनी विश्वासार्हता गमावल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या ४५६ कोटींच्या काही कामांचे तसेच वेदपाठशाळेचे उद्घाटन रविवारी पार पडले. याला मनसेचे केडीएमसीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी हरकत घेतली आहे. एमएमआरडीएकडून केवळ तत्त्वत: मंजुरी मिळाली असून रस्त्यांचाडीपीआर तयार करण्यासाठी त्यांच्याकडून कन्सल्टंट नेमण्यास सांगण्यात आले आहे. कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासर्व गोष्टी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ४५६ कोटींच्या रस्त्यांची घोषणा आणि त्यातील काही कामांचे भूमिपूजन करणे म्हणजे नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध असताना गेल्या साडेचार वर्षांत राज्यमंत्र्यांनी निधी का नाही आणला, असाही सवाल त्यांनी केला. केडीएमसीने वृद्धांच्या संगोपनासाठी देऊ केलेल्या जागेत बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचे उद्घाटन करण्याचा घाट घालून एकप्रकारे डोंबिवलीतील ब्राह्मण समाजाचीही राज्यमंत्र्यांनी फसवणूक केली असून याची कल्पना ब्राह्मण महासंघाला नसावी, असेही हळबेम्हणाले. आमचा वेदपाठशाळेला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने होणार असेल तर त्याला आम्ही हरकत घेणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगरी समाजातील मानबिंदू असलेले आन आणि मान ठाकूर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळीही महापालिकेतील लोकप्रतिनिधींना तसेच मित्रपक्ष शिवसेनेलाही अंधारात ठेवून कार्यक्रम उरकण्यात आला. मागच्या निवडणुकीतील स्मारकाचेवचन येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांना आठवले असल्याचे सांगताना भाजपकडून जातीचे राजकारण खेळले जातअसल्याचा आरोपही यावेळी हळबे यांनी केला.

शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही राज्यमंत्र्यांच्या कृतीवर चांगलेच तोंडसुख घेतले. डोंबिवलीकरांना जातीपातीमध्ये विभागून चुचकारण्याचा प्रयत्न करून राज्यमंत्री डोंबिवलीमध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत. त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आयुक्त आणिअधिकारीही त्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. महापालिकेच्या इस्टेट मॅनेजरवर दबाव टाकून बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचा घाटघालण्यात आला असून याला आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत. फसव्या आणि खोटारड्या राज्यमंत्र्यांपासून सावध राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका