शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डोंबिवलीकरांची केली राज्यमंत्र्यांनी फसवणूक;  मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 00:13 IST

वेदपाठशाळेचा बेकायदेशीरपणे घातला घाट

डोंबिवली : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे ४५६ कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या काही कामांचे भूमिपूजन आणि वेदपाठशाळेच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप मनसेने केला आहे. चव्हाण यांनीडोंबिवलीकरांची फसवणूक केली असून त्यांनी विश्वासार्हता गमावल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या ४५६ कोटींच्या काही कामांचे तसेच वेदपाठशाळेचे उद्घाटन रविवारी पार पडले. याला मनसेचे केडीएमसीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी हरकत घेतली आहे. एमएमआरडीएकडून केवळ तत्त्वत: मंजुरी मिळाली असून रस्त्यांचाडीपीआर तयार करण्यासाठी त्यांच्याकडून कन्सल्टंट नेमण्यास सांगण्यात आले आहे. कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासर्व गोष्टी पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ४५६ कोटींच्या रस्त्यांची घोषणा आणि त्यातील काही कामांचे भूमिपूजन करणे म्हणजे नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध असताना गेल्या साडेचार वर्षांत राज्यमंत्र्यांनी निधी का नाही आणला, असाही सवाल त्यांनी केला. केडीएमसीने वृद्धांच्या संगोपनासाठी देऊ केलेल्या जागेत बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचे उद्घाटन करण्याचा घाट घालून एकप्रकारे डोंबिवलीतील ब्राह्मण समाजाचीही राज्यमंत्र्यांनी फसवणूक केली असून याची कल्पना ब्राह्मण महासंघाला नसावी, असेही हळबेम्हणाले. आमचा वेदपाठशाळेला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने होणार असेल तर त्याला आम्ही हरकत घेणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगरी समाजातील मानबिंदू असलेले आन आणि मान ठाकूर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळीही महापालिकेतील लोकप्रतिनिधींना तसेच मित्रपक्ष शिवसेनेलाही अंधारात ठेवून कार्यक्रम उरकण्यात आला. मागच्या निवडणुकीतील स्मारकाचेवचन येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यांना आठवले असल्याचे सांगताना भाजपकडून जातीचे राजकारण खेळले जातअसल्याचा आरोपही यावेळी हळबे यांनी केला.

शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही राज्यमंत्र्यांच्या कृतीवर चांगलेच तोंडसुख घेतले. डोंबिवलीकरांना जातीपातीमध्ये विभागून चुचकारण्याचा प्रयत्न करून राज्यमंत्री डोंबिवलीमध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत. त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आयुक्त आणिअधिकारीही त्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. महापालिकेच्या इस्टेट मॅनेजरवर दबाव टाकून बेकायदेशीरपणे वेदपाठशाळेचा घाटघालण्यात आला असून याला आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत. फसव्या आणि खोटारड्या राज्यमंत्र्यांपासून सावध राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका