शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी

By सदानंद नाईक | Updated: July 3, 2024 19:40 IST

सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

उल्हासनगर : लाडली बहीण योजनेला गालबोट लागण्यापूर्वी तहसील कार्यालतील बंद असलेले सेतू केंद्र आठ दिवसात सुरू करण्याची मागणी मनसेची जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

 उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र गेल्या दिड वर्षांपासून सुरू बंद असल्यामुळे, नागरिकांना नाईलाजाने एजंटचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एका दाखल्यासाठी ३५ रुपये खर्च असतांना हजारो रुपये द्यावे लागत आहे. असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहरप्रमुख संजय घुगे यांनी केला. सेतूकेंद्र तात्काळ सुरु करून शासनच्या लाडली बहीण योजनेला हातभार लावण्याची मागणी त्यांनी केली. शासनाच्या लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी रहिवाशी दाखला व उत्त्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. त्यामुळे महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु हे दाखले देतांना ती व्यक्ती खरोखर महाराष्ट्राची रहिवाशी आहे का..? किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहते. त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता हा महाराष्ट्राचा आहे का.? त्यांनी जमा केलेले कागदपत्र खरे आहेत का...? याची तपासणी होणे आवश्यक आहे. असे देशमुख यांचे म्हणणे आहे. ३ ते ४ हजार रुपये घेऊन, असे दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रांत अधिकारी आनंदकुमार शर्मा व तहसीलदार कल्यानी कदम यांना निवेदन देतांना, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, सचिन बेंडके, रवी पाल, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, संकेत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे