शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी

By सदानंद नाईक | Updated: July 3, 2024 19:40 IST

सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

उल्हासनगर : लाडली बहीण योजनेला गालबोट लागण्यापूर्वी तहसील कार्यालतील बंद असलेले सेतू केंद्र आठ दिवसात सुरू करण्याची मागणी मनसेची जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

 उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र गेल्या दिड वर्षांपासून सुरू बंद असल्यामुळे, नागरिकांना नाईलाजाने एजंटचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे एका दाखल्यासाठी ३५ रुपये खर्च असतांना हजारो रुपये द्यावे लागत आहे. असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहरप्रमुख संजय घुगे यांनी केला. सेतूकेंद्र तात्काळ सुरु करून शासनच्या लाडली बहीण योजनेला हातभार लावण्याची मागणी त्यांनी केली. शासनाच्या लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी रहिवाशी दाखला व उत्त्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. त्यामुळे महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु हे दाखले देतांना ती व्यक्ती खरोखर महाराष्ट्राची रहिवाशी आहे का..? किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहते. त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता हा महाराष्ट्राचा आहे का.? त्यांनी जमा केलेले कागदपत्र खरे आहेत का...? याची तपासणी होणे आवश्यक आहे. असे देशमुख यांचे म्हणणे आहे. ३ ते ४ हजार रुपये घेऊन, असे दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रांत अधिकारी आनंदकुमार शर्मा व तहसीलदार कल्यानी कदम यांना निवेदन देतांना, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, सचिन बेंडके, रवी पाल, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे, संकेत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे