शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

निकृष्ट दर्जाला चाप लावुन खड्डयांच्या दुरुस्तीला सुरुवात; वाटमारीला आयुक्तांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 6:17 PM

मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असुन त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही राजकीय तसेच ुविविध सामाजिक संस्थांकडुन अनेकदा करण्यात येते. त्या तक्रारींवर तात्पुरत्या मलमपट्टीचे आश्वासन देऊन खड्डयाची दुरुस्ती प्रशासनाकडुन केली जाते. यामुळे दुरुस्त झालेले खड्डे पुन्हा उखडुन पालिकेने खर्ची घातलेला निधी खड्डयात जात असल्याची बाब चव्हाट्यावर येते. रस्त्यावरील बहुतांशी खड्डे गणेशोत्सवातही जैसे थे असल्याने मनसेने थेट गणपतीच्या प्रतिकात्मक उपस्थितीत पालिका मुख्यालयात आंदोलन करुन खड्डे अनंत चतुर्थीपर्यंत दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी प्रशासनाने खड्डे दुरुस्तीला सुरुवात केली खरी परंतु, कंत्राटदाराने खड्यांतील धुळ, माती व कचरा साफ न करताच खड्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार थेट आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कंत्राटदाराच्या कामातील निकृष्ट दर्जाला लगाम घालुन योग्य पद्धतीनेच खड्डे दुरुस्ती करण्याचे फर्मान सोडले. घटनास्थळी वरीष्ठ अधिका-यांना पाचारण करुन त्यांना कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. यानंतर काही खड्यांची दुरुस्ती करण्यात आली असली तरी आजही अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. सततच्या खड्डे दुरुस्तीच्या मागणीला कंटाळून अखेर मनविसेचे शहर सचिव शान पवार यांनी खड्डे दुरुस्ती न करता वाहनचालकांच्या माहितीसाठी खड्डयांचे फलकच रस्त्याच्या कडेला लावावेत, अशी सुचना थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदनाद्वारे केली. दरम्यान आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे दुरुस्तीसाठी सुचित केलेल्या पद्धतीचा वापर करण्यास कंत्राटदाराकडुन सुरुवात करण्यात आल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले. खड्डे दुरुस्तीपुर्वी त्यातील धुळ, माती, कचरा हवेच्या फवा-याने काढावी, खड्डे धुळमुक्त झाल्यासच त्यात टार (रसायनयुक्त डांबराचा द्रव पदार्थ) टाकावे. शेवटी त्यावर डांबरयुक्त खडी टाकून त्याचे सपाटीकरण करण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे खड्डे दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.