शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तारांगण निवडणूक रिंगणाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 00:00 IST

कलाकार गायब : मतांवर फारसा परिणाम होत नसल्याची उमेदवारांची भावना

ठाणे : मुंबई व पुण्यात काही उमेदवारांच्या प्रचाराकरिता सनी देओलपासून संजय दत्तपर्यंत काही कलाकार उतरलेले दिसत असताना ठाण्यातील उमेदवारांनीच कलाकारांना रिंगणाबाहेर ठेवल्याची चर्चा आहे. प्रचाराला कलाकार आणला म्हणून मते वाढत नाहीत, असा अनेक उमेदवारांचा पूर्वानुभव असल्याने कलाकारांना प्रचारफेऱ्यांमध्ये आणण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे.

ठाण्यात मकरंद अनासपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय मांडलेकर, रवी जाधव, विजू माने, जुई गडकरी असे असंख्य कलाकार राहतात. मात्र, त्यापैकी कुणीही एखाद्या उमेदवाराच्या प्रचारफेरीत किंवा सभेत दिसले नाही. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील धर्मेश व्यास, त्रिशा शहा, सोनिया शाह आदी कलाकार मंगळवारी सहभागी झाले, तर बुधवारी श्रेयस तळपदे व आदित्य पांचोली यांनी प्रचारात भाग घेतला. मात्र, हा अपवाद वगळता ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कुठल्याही उमेदवाराने कलाकारांच्या प्रचाराकरिता आधार घेतलेला नाही. कलाकार उमेदवाराच्या मैत्रीपूर्ण संबंधांकरिता येतात किंवा मानधन घेऊन येतात.

शर्मांसारखे अधिकारी हे दीर्घकाळ पोलीस दलात राहिल्यामुळे त्यांचे कलाकारांशी व प्रामुख्याने पेज थ्री वर्तुळात घनिष्ट संबंध आहेत. काही राजकीय नेते कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. त्यामुळे मग त्या नेत्याच्या शब्दाखातर त्यांना प्रचारात सहभागी व्हावे लागते. मात्र, कलाकारांना जर पैसे देऊन आणायचे झाले, तर ते एका तासाकरिता ५० हजारांपासून लाख ते दोन लाख रुपये मानधन घेतात. त्यांना येण्याजाण्याकरिता बीएमडब्ल्यू, आॅडी किंवा तत्सम महागड्या मोटारींची व्यवस्था करावी लागते. जेवढ्या कालावधीकरिता पैसे मिळाले आहेत, तेवढा कालावधी पूर्ण होताच कलाकार निघून जातात. कलाकारांना पाहायला लोक जमतात. मात्र, ती गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल, याची कुठलीही खात्री नसल्याचे अनेक उमेदवारांना आता कळून चुकले आहे.

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराकरिता तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्ममध्ये कुशल बद्रिके दिसतात. त्याखेरीज, मुंब्रा-कळवा मतदारसंघात दीपाली सय्यद या अभिनेत्री रिंगणात असूनही तेथे कुणी कलाकार सय्यद यांच्या मदतीला आल्याचे दिसत नाही. मनोज तिवारी व रवी किशन हे भोजपुरी कलाकार काही उमेदवारांच्या प्रचाराकरिता ठाण्यात पायधूळ झाडून गेले.

उमेदवार सक्षम असल्याने दुर्लक्षठाण्यातील बहुतांश लढती थेट असून तेथे महायुतीच्या नेत्यांनीही खूप लक्ष केंद्रित केलेले नाही. उमेदवार हे स्वत:च्या बळावर आपली लढाई लढण्यास सक्षम असल्याचा विश्वास कदाचित नेत्यांना वाटत असल्याने नेतेच प्रचारात तुरळक दिसत असतील, तर प्रचाराकरिता कलाकारांची जोड घेण्याची गरज वाटलेली नसेल. याखेरीज, अनेकदा उमेदवारांच्या प्रचारफेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले असते. कलाकार बोलवला आणि त्याला तास-दोन तास ताटकळत बसावे लागले, तर तो नाराज होतो, ही अडचण असल्याचे काही पदाधिकाºयांनी सांगितले. 

सध्या सर्वच कलाकारांकडे भरपूर काम आहे. त्यामुळे त्यांना वेळ नाही. कुठलाही कलाकार जर बोलवायचा असेल, तर दीड ते दोन महिने अगोदर त्याची तारीख पक्की करावी लागते. ते निवडणूक काळात शक्य नाही. शिवाय, एका विशिष्ट पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन स्वत:वर पक्षाचा स्टॅम्प लावून घेण्यामुळे कलाकारांची अडचण होते. कारण, कलाकारांचे सर्वच पक्षांत मित्र असतात व त्यांना कधीही कुणाच्याही मदतीची गरज लागू शकते. पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सादरीकरणाकरिता हजेरी लावणे व पक्षाला मते देण्याचे आवाहन करण्याकरिता उपस्थित राहणे, या दोन भिन्न बाबी आहेत.

- विजू माने, चित्रपट दिग्दर्शक