शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाण्यात स्थायी समितीचे अडले घोडे, सध्या आयुक्तांच्या बजेटनुसार कामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:46 IST

सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.

ठाणे : सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यामुळे आता यापुढील प्रस्ताव थेट महासभेतच मंजुरीसाठी जाणार आहेत. परंतु, त्या आधीच महत्त्वाची कामे खोळंबू नयेत म्हणून आयुक्तांच्याच बजेटमधून काही कामे केली जात असल्याची बाब समोर आली आहे.ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची गणिते जुळविण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसची मदत घेतली होती. परंतु, ही मदत चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी केला होता. यविरोधात विरोधक न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड व्हावी असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतांनाही शिवसेनेने पुन्हा काँग्रेसलाच हाताशी धरून पुन्हा चुकीच्या पद्धतीने निवड केली. त्यामुळे आता स्थायी समितीचे पुन्हा भिजत घोंगडे राहणार असल्याचे दिसत आहे. त्यात आता केवळ आर्थिक गणिते जुळावीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निधी मिळावा म्हणूनच ही सत्ताधाऱ्यांना समिती गठीत करायची नसल्याचा आरोप राष्टÑवादीने केला होता. त्यामुळे स्थायीचे प्रस्ताव महासभेत नेऊन मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांमुळे स्थायीचे गणित पुन्हा कोलमडले आहे. त्यामुळे स्थायी समिती गठीत होत नाही, तो पर्यंत विकास कामे खोळंबू नयेत म्हणून आता पालिकेने आयुक्तांच्या बजेटनुसार कामे करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, नालेसफाई अशी अत्यावश्यक कामे याच बजेटमधून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.