शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेसाठी अखेर शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार 

By धीरज परब | Updated: February 12, 2023 14:22 IST

माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे .

मीरारोड - माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे . पहिल्याच दिवशी ह्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदळवनातील कचरा उचलला असला तरी डेब्रिसची समस्या मोठी आहे . 

कांदळवन हे कायदे - नियम व न्यायालयांच्या आदेशा नुसार संरक्षित आहे . कांदळवनाचे महत्व दुर्लक्षित करून मीरारोडच्या सृष्टी ते पेणकरपाडा मार्गावरील जाफरी खाडी क्षेत्रातील कांदळवन मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा , डेब्रिसचा भराव केला जात असून त्यात काही बेकायदा बांधकामे देखील झाली आहेत .  येथे लहान मोठ्या टेम्पोतून नियमित डेब्रिस टाकले जाते . महापालिका बेकायदा घातक प्रदूषित सांडपाणी बेकायदा सोडत आहे . 

पर्यावरणाचा ऱ्हास व कचरा - डेब्रिसच्या भरावाने होणारी अस्वच्छता पाहून पेणकरपाडा मधील प्रेमा लक्ष्मण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच पालिका व राजकारणी यांच्यावर भरवसा न ठेवता स्वतःच कांदळवन मध्ये स्वच्छता मोहीम सुरु केली आहे . 

शनिवारी ८ वी व ९ वी च्या सुमारे १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी कांदळवन मधील कचरा उचलल्याची माहिती शाळेचे संचालक दीपेश गावंड यांनी दिली .  कांदळवन मध्ये टाकलेला बंदी असलेले प्लास्टिक व इतर  कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून सफाई केली . मोहिमेत विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक , पर्यावरणासाठी कार्य करणारे स्थानिक तरुण रितेश पाटील आदी सहभागी झाल्याचे गावंड म्हणाले . 

पर्यावरणाचा रोज डोळ्या देखत होत असलेला ऱ्हास पाहून त्याच्या संरक्षणाची व स्वच्छतेची भावना जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे . मुळात पर्यावरण संरक्षण हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे अशी भावना विद्यार्थी व शिक्षकांनी बोलून दाखवली .

एरव्ही माझी वसुंधरा , स्वच्छता आणि सुशोभीकरणचा दिखावा करणारे माजी नगरसेवक , राजकारणी व पालिका प्रशासन  मात्र कांदळवनात टाकला जाणारा कचरा , डेब्रिस  कडे कमालीची डोळेझाक करत आहेत . प्रशासन व राजकारणी यांनी पर्यावरणाच्या संरक्षणा कडे दुर्लक्ष करणे हे शहर व नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक असल्याचे यावेळी रितेश पाटील यांनी सांगितले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरStudentविद्यार्थी