शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

एसआरए योजना विस्ताराचा चेंडू नव्या मंत्रिमंडळाकडे, मंजुरीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:35 IST

मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते.

ठाणे : मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते. आता नव्या मंत्रिमंडळाच्या कोर्टात हा चेंडू आला आहे. या प्रक्रियेतील सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून आता केवळ अंतिम मंजुरीसाठी म्हणजेच केवळ अध्यादेश काढणे शिल्लक आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार या क्षेत्रांत एसआरए अर्थात (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ या महानगर क्षेत्रांपर्यंत या योजनेचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.सध्या एसआरए ही योजना मुंबई आणि ठाण्यात सुरू आहे. ठाण्यात या योजनेचे स्वतंत्र कार्यालय २०१४ मध्ये सुरू केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना या योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईला खेपा घालाव्या लागत नाहीत. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा, यासाठी ठाणे आणि मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. दरम्यान, ठाणे शहरामध्ये ६० टक्के बेकायदा बांधकामे असून त्यामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे.त्यामुळे ठाण्यापर्यंत प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला होता. सध्या घोडबंदर भागातील ठाणे महापालिकेच्या भाजीमंडईच्या इमारतीत या योजनेचे कार्यालय सुरू आहे. ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनासंबंधीच्या प्रस्तावांना याच कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे. परंतु, आता एमएमआरए रिजनमध्ये ती राबविण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले होते.उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबईला वगळलेसध्या मुंबई आणि ठाण्यात एसआरएसचे कार्यालय आहे. परंतु, आता या योजनेचा विस्तार एमएमआरए रिजनपर्यंत वाढणार असल्याने त्याचे मध्यवर्ती कार्यालय हे ठाणे हेच असणार आहे. त्यामुळे येथील कार्यालयासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. याच कार्यालयातून कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या भागातील झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भातील प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे.परंतु, या योजनेतून उल्हासनगर आणि पनवेल ही शहरे वगळली जाणार आहेत. उल्हासनगर भागात कॅम्प पद्धतीने इमारती असून याठिकाणी झोपडपट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या पनवेल हे शहर लांब अंतरावर आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे वगळण्यात येणार आहेत.उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्षआधीच्या सरकारच्या काळात या प्रस्तावासंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याची माहिती एसआरएच्या सूत्रांनी दिली. केवळ आता अंतिम मंजुरी म्हणजेच अध्यादेश काढणे शिल्लक असून तसे झाल्यास खऱ्या अर्थाने एसआरएचा विस्तार एमएमआरए रिजनमध्ये होण्यास मदत होणार आहे. आता नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हा अध्यादेश काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार