शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

कल्याण-डोंबिवली, भाईंदर, भिवंडीपर्यंत आता एसआरए

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:15 IST

उल्हासनगर-पनवेलला वगळणार; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आग्रही

ठाणे : मुंबई आणि ठाण्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा अखेर पुढील महिन्यात विस्तार होणार आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महानगरांतही एसआरए अर्थात (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना राबवली जाणार आहे. परंतु, यामधून उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेलला वगळण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भातील अध्यादेश फेब्रुवारी महिन्यात काढण्यासाठी राज्य शासनाकडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.सध्या एसआरए योजना मुंबई आणि ठाण्यात सुरू आहे. ठाण्यात तिचे स्वतंत्र कार्यालय २०१४ मध्ये सुरू केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना तिच्या मंजुरीसाठी मुंबईला खेपा घालाव्या लागणार नाहीत. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा, यासाठी ठाणे आणि मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जात आहे. ठाणे शहरामध्ये ६० टक्के बेकायदा बांधकामे असून त्यामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ठाण्यापर्यंत प्राधिकरणाचा विस्तार केला होता.घोडबंदर येथे महापालिकेच्या भाजी मंडईच्या इमारतीत या योजनेचे कार्यालय आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनासंबंधीच्या प्रस्तावांना याच कार्यालयातून मंजुरी दिली जाते. परंतु, आता एमएमआरए रिजनमध्ये ती राबवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत.स्वतंत्र सीईओ नेमणारसध्या मुंबई आणि ठाण्यात एसआरएचे कार्यालय आहे. परंतु, आता या योजनेचा विस्तार एमएमआरए रिजनपर्यंत वाढणार असल्याने त्याचे मध्यवर्ती कार्यालय हे ठाणे हेच असणार आहे. त्यामुळे येथील कार्यालयासाठी स्वतंत्र सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याच कार्यालयातून कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या भागांतील झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भातील प्रस्तावांना ठाणे कार्यालयातूनच मंजुरी मिळणार आहे.नवी मुंबईलाही वगळणारया योजनेतून नवी मुंबईसह उल्हासनगर आणि पनवेल ही शहरे वगळली जाणार आहेत. उल्हासनगर भागात कॅम्प पद्धतीने इमारती असून याठिकाणी झोपड्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या पनवेल हे शहर लांब अंतरावर आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे वगळण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई हे नियोजित शहर असल्यामुळे तेही वगळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीbhayandarभाइंदरbhiwandiभिवंडी