शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

कल्याण-डोंबिवली, भाईंदर, भिवंडीपर्यंत आता एसआरए

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:15 IST

उल्हासनगर-पनवेलला वगळणार; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आग्रही

ठाणे : मुंबई आणि ठाण्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा अखेर पुढील महिन्यात विस्तार होणार आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महानगरांतही एसआरए अर्थात (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजना राबवली जाणार आहे. परंतु, यामधून उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेलला वगळण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भातील अध्यादेश फेब्रुवारी महिन्यात काढण्यासाठी राज्य शासनाकडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.सध्या एसआरए योजना मुंबई आणि ठाण्यात सुरू आहे. ठाण्यात तिचे स्वतंत्र कार्यालय २०१४ मध्ये सुरू केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना तिच्या मंजुरीसाठी मुंबईला खेपा घालाव्या लागणार नाहीत. झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा, यासाठी ठाणे आणि मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जात आहे. ठाणे शहरामध्ये ६० टक्के बेकायदा बांधकामे असून त्यामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ठाण्यापर्यंत प्राधिकरणाचा विस्तार केला होता.घोडबंदर येथे महापालिकेच्या भाजी मंडईच्या इमारतीत या योजनेचे कार्यालय आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनासंबंधीच्या प्रस्तावांना याच कार्यालयातून मंजुरी दिली जाते. परंतु, आता एमएमआरए रिजनमध्ये ती राबवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत.स्वतंत्र सीईओ नेमणारसध्या मुंबई आणि ठाण्यात एसआरएचे कार्यालय आहे. परंतु, आता या योजनेचा विस्तार एमएमआरए रिजनपर्यंत वाढणार असल्याने त्याचे मध्यवर्ती कार्यालय हे ठाणे हेच असणार आहे. त्यामुळे येथील कार्यालयासाठी स्वतंत्र सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याच कार्यालयातून कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या भागांतील झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भातील प्रस्तावांना ठाणे कार्यालयातूनच मंजुरी मिळणार आहे.नवी मुंबईलाही वगळणारया योजनेतून नवी मुंबईसह उल्हासनगर आणि पनवेल ही शहरे वगळली जाणार आहेत. उल्हासनगर भागात कॅम्प पद्धतीने इमारती असून याठिकाणी झोपड्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या पनवेल हे शहर लांब अंतरावर आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे वगळण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई हे नियोजित शहर असल्यामुळे तेही वगळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीbhayandarभाइंदरbhiwandiभिवंडी