शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

ठाणे जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; १४ हजारांनी दिली मूल्यमापन चाचणी

By सुरेश लोखंडे | Updated: September 22, 2025 18:01 IST

सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.      

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवारी ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९६८ परीक्षा केंद्रांवर पार पडली. या चाचणीसाठी एकूण १९ हजार ८२८ परीक्षार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १४ हजार ९६ असाक्षरांनी चाचणीला उपस्थिती लावली. यामध्ये सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.            

केंद्र सरकारच्या ‘उल्लास’ अॅपच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या असाक्षर प्रौढांसाठी ही चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ही पहिली मूल्यमापन चाचणी असून दुसरी चाचणी परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या पार पडलेल्या चाचणी परीक्षेसाठी मीरा भाईंदर महापालिका शहरातून तीन हजार ९ जणांची नाेंदणी झाली हाेती. तर या परीक्षेला सर्वाधिक एक हजार ७५५ जणांची उपस्थिती शहापूर तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर हाेती. याप्रमाणेच उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड व भिवंडी तालुक्यांमध्येही समाधानकारक प्रतिसाद हाेता. जिल्ह्यातील एकूण १९६८ परीक्षा केंद्रांवर ही मूल्यमापन चाचणी घेण्यात आली.

पुढील टप्यात डिजिटल साक्षरता -

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने साक्षरतेचा पाया मजबूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित केली असून, या माध्यमातून असाक्षर प्रौढांना ‘नवसाक्षर’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे. चाचणीमुळे त्यांचा भाषा व गणितातील प्राथमिक ज्ञानावर आधारित प्रगतीचा आढावा घेता येणार आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून यशस्वी उमेदवारांना नवसाक्षरतेचा दर्जा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात डिजिटल साक्षरता व कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे.

एकूण आकडेवारी:

एकूण नोंदणी - १९,८२८

एकूण उपस्थित परीक्षार्थी - १४,०९६

एकूण परीक्षा केंद्रे - १,९६८

महिला परीक्षार्थी - ११,३९४

पुरुष परीक्षार्थी - २,७०२

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण