शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भाजपाच्या गाव चलो अभियानास उस्फुर्त प्रतिसाद; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By नितीन पंडित | Updated: February 8, 2024 19:36 IST

कोकण विभागात एकूण सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या १४ संघटनात्मक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात असून आता पर्यंत त्यास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे

भिवंडी :लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चे बांधणी करण्यात सुरुवात केली असून ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान या उपक्रमात प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक बूथ मधील नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यास उस्फुर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याची माहिती गाव चलो अभियान प्रदेश संयोजन समितीचे सहसंयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी गुरुवारी भिवंडीत दिली आहे.

राज्यातील सर्व खेडोपाडी व शहरातील सर्व बूथ यामध्ये हे प्रवासी कार्यकर्ते एक दिवस २४ तास त्या गावात राहून स्थानिक नागरिक,युवक,महिला,शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय,माजी सैनिक,आशा अंगणवाडी सेविका ,लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत. यामध्ये नागरिकांकडून योजना राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेत सूचना सुध्दा  स्वीकारणार असून त्याचा उपयोग निवडणूक जाहीरनामा बनवताना होणारा आहे अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली.  कोकण विभागात एकूण सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या १४ संघटनात्मक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात असून आता पर्यंत त्यास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रवासी कार्यकर्ते यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील कार्यकर्ते ग्रामीण भागात काम करतील तर लोकसभा निवडणुका पूर्ण होई पर्यंत दर पंधरा दिवसांनी हे प्रवासी कार्यकर्ते नेमुन दिलेल्या गावांना भेटी देतील अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील कोनगावात राबविणार अभियान

गाव चलो अभियान अंतर्गत सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी सर्वसामान्य प्रवासी कार्यकर्ते म्हणून आपले योगदान देणार आहेत.यामध्ये केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे रविवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्या पासून कोनगाव या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ते म्हणून अभियानात सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील संयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे.