शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

बाळकूम, कोलशेत,ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:46 IST

वाढत्या रुग्णसंख्येनंतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा निर्णय 

ठाणे : ठाण्यात अनलॉकनंतर गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आता माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या कोलशेत ,ढोकळी आणि बाळकूम परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात ७ दिवस उत्सुर्तपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली जाणार असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करणारे ठाण्यातील हे पहिले परिसर आहेत. 

  ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून अनलॉकनंतर तर यामध्ये आणखी भर पडली आहे. रुग्णावढीचा वेग देखील वाढला असून दररोज १५० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. रविवारी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून संपूर्ण ठाणे शहरात २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक ६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याने इथल्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नागरसेवक संजय भोईर यांनी बाळकूम, कोलशेत आणि ढोकाळी परिसरातील काही सोसायटी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आजपासून पुढील सात दिवस हा लॉकडाऊन असणार आहे अशी माहिती भोईर यांनी दिली आहे. 

         या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा,मेडिकल,हॉस्पिटल्स,रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय  (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व प्रकारचे किराणा स्टोअर्स,भाजीपाला,मच्छी विक्रेते, मटण चिकन विक्रेते सात दिवस बंद राहणार आहे. कोरोना हटाव बाळकूम, कोलशेत,ढोकाळी बचाव अशा आशयाच्या पोस्ट देखील या परिसरात सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत. 

" अनलॉक नंतरच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिसरात २५० पेक्षा अधिक सोसायटी असून तेवढाच ५० टक्के भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न केल्यामुळे संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी हा सात दिवसांचा लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना देखील लॉकडाऊन हवा होता . तरच ही साखळी तुटण्याची शक्यता आहे.                                                                                                    - संजय भोईर, नगरसेवक , ठा.म.पा 

"काही दिवस अनलॉक करून पुन्हा लॉकडाऊन करणे आवश्यक होते. मात्र तसे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे प्रशासनाची वाट न बघता आपल्या सुरक्षितेसाठी स्वतःहुन लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती.                                                                                                  - ओमप्रकाश पाटील, रहिवासी, बाळकूम

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस