शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचा विशेष निधी, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:15 IST

मागील १५ दिवसात पारसिक बोगद्यावरुन पालिकेने तब्बल ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. त्यानंतर बुधवारी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देरेल्वे मार्फत संरक्षक भिंत उभारली जाणारजलकुंभही उभारला जाणार

ठाणे - मागील कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात पालिकेने आता पर्यंत येथून तब्बल ७० मेट्रीक टन कचरा उचलला आहे. तर अजून ५० ते ६० मेट्रीक टन कचरा २ आॅक्टोबरपर्यंत काढला जाऊन येथील परिसराचे रुपडे पालटले जाणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच येथील वाघोबा नगर आणि भास्कर नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज देण्याची घोषणासुध्दा त्यांनी केली आहे. तर बुधवारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारसिकच्या बोगद्याच्यावर वृक्षारोपणाची मोहीमसुध्दा राबविण्यात आली.                         बुधवारी आयुक्तांनी येथील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त मनीज जोशी, संदीप माळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भास्कर नगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागात झोपडपट्टींचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. परंतु मागील १५ दिवसात येथून पालिकेने रोबोटीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. तर अजून शिल्लक ५० ते ६० मेट्रीक टन कचरा येत्या २ आॅक्टोबर पर्यंत काढला जाऊन येथील परिसर चकाचक केला जाणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.                       तसेच या ठिकाणी खालील बाजूस एका उद्यानाची निर्मिती केली जाणार असून जेणे करुन रेल्वेने प्रवास करणाºयांना येथे बघितल्यावर थोडे समाधान वाटणार आहे. शिवाय रेल्वेकडे चर्चा व पत्रव्यवहार करुन संरक्षक भिंत उभारण्यासाठी सांगितले जाणार आहे. याठिकाणी असलेल्या काही झोडप्यांमुळे येथे रेल्वे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील झोपड्या हटविण्याची कारवाईसुध्दा केली जाणार आहे. तसेच वरील भागात एक जलकुंभ उभारला जाणार असून भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असून त्या संदर्भातील प्रस्ताव आॅक्टोबरमधील महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला जाणार आहे.दरम्यान, बुधवारी येथील दोन शाळांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पारसिक बोगद्यावर ३०० हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. दुसरीकडे डायघर डम्पींग ग्राऊंड भागातील नागरीकांच्या सोई सुविधांसाठी तसेच येथील विकास कामांसाठी १५ ते २० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त