शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचा विशेष निधी, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:15 IST

मागील १५ दिवसात पारसिक बोगद्यावरुन पालिकेने तब्बल ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. त्यानंतर बुधवारी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देरेल्वे मार्फत संरक्षक भिंत उभारली जाणारजलकुंभही उभारला जाणार

ठाणे - मागील कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात पालिकेने आता पर्यंत येथून तब्बल ७० मेट्रीक टन कचरा उचलला आहे. तर अजून ५० ते ६० मेट्रीक टन कचरा २ आॅक्टोबरपर्यंत काढला जाऊन येथील परिसराचे रुपडे पालटले जाणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच येथील वाघोबा नगर आणि भास्कर नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज देण्याची घोषणासुध्दा त्यांनी केली आहे. तर बुधवारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारसिकच्या बोगद्याच्यावर वृक्षारोपणाची मोहीमसुध्दा राबविण्यात आली.                         बुधवारी आयुक्तांनी येथील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त मनीज जोशी, संदीप माळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भास्कर नगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागात झोपडपट्टींचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. परंतु मागील १५ दिवसात येथून पालिकेने रोबोटीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. तर अजून शिल्लक ५० ते ६० मेट्रीक टन कचरा येत्या २ आॅक्टोबर पर्यंत काढला जाऊन येथील परिसर चकाचक केला जाणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.                       तसेच या ठिकाणी खालील बाजूस एका उद्यानाची निर्मिती केली जाणार असून जेणे करुन रेल्वेने प्रवास करणाºयांना येथे बघितल्यावर थोडे समाधान वाटणार आहे. शिवाय रेल्वेकडे चर्चा व पत्रव्यवहार करुन संरक्षक भिंत उभारण्यासाठी सांगितले जाणार आहे. याठिकाणी असलेल्या काही झोडप्यांमुळे येथे रेल्वे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील झोपड्या हटविण्याची कारवाईसुध्दा केली जाणार आहे. तसेच वरील भागात एक जलकुंभ उभारला जाणार असून भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असून त्या संदर्भातील प्रस्ताव आॅक्टोबरमधील महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला जाणार आहे.दरम्यान, बुधवारी येथील दोन शाळांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पारसिक बोगद्यावर ३०० हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. दुसरीकडे डायघर डम्पींग ग्राऊंड भागातील नागरीकांच्या सोई सुविधांसाठी तसेच येथील विकास कामांसाठी १५ ते २० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त