शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

‘रिव्हर व्ह्यू’ फ्लॅट २० लाखांत, पण...; बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे एक सबळ कारण

By पंकज पाटील | Updated: August 25, 2024 08:31 IST

पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क|बदलापूर : ‘अवघ्या २० ते २५ लाखांत निसर्गरम्य बदलापुरात रिव्हर व्ह्यू फ्लॅट’ अशा आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी उल्हास नदीच्या तीरावर वसवलेले बदलापूरमधील कॉम्प्लेक्स तासभर मुसळधार वृष्टी झाली की, पुराच्या पाण्यात बुडून जातात. अगदी पहिला मजला पाण्याखाली जाण्याइतकी भीषण परिस्थिती येथील मध्यमवर्गीय नागरिकांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहिली आहे. बदलापूरकर हे पुराने तर त्रस्त आहेतच पण नदीच्या पात्रालगतचे भूखंड विकले गेल्यावर व तेथे बांधकामे उभी राहिल्यावर पूर नियंत्रण रेषा निश्चित केल्याने काही भूखंडावरील बांधकामे थांबली आहेत. बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे हे एक सबळ कारण आहे.

बदलापूर शहराचा विकास झाला तो उल्हास नदीच्या तीरावरच. मात्र गेल्या दहा वर्षांत शहराच्या बाह्य भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाल्यामुळे आता बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली. रहिवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. २६ जुलै २००५ च्या महापुरात बदलापूर शहराची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर या बदलापूर शहरात घर घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. एवढेच नव्हे तर पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

तीन ते चार वर्षे उलटल्यानंतर बिल्डरांनी पुन्हा उचल खाल्ली. बदलापूर शहराचा विकास सुरू झाला. उल्हास नदीच्या तीरावर पूर्वीपासून उभ्या राहिलेल्या इमारती आणि त्यामधील कुटुंबे आजही मुसळधार पाऊस पडू लागल्यावर दहशतीच्या वातावरणातच वावरत असतात. पावसाळा सुरू झाल्यावर अखंडित पाऊस पडू लागल्यावर पूर कधी दारात येईल याची शाश्वती बदलापूरकर देऊ शकत नाहीत.  प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करायचा, घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान सहन करायचे अशी वेळ बदलापूरकरांना आली आहे.

ग्रामस्थांच्या नाराजीचे काय?पुराचा फटका कमी बसावा यासाठी पूर नियंत्रण रेषा आखण्यात येते. मात्र बदलापूरची पूर नियंत्रण रेषा ही शहराचा विकास पूर्ण झाल्यानंतर आखण्यात आली. त्यामुळे काही इमारतींची कामे रखडली. तेथे घरे खरेदी केलेल्यांची पंचाईत झाली.

पूर नियंत्रण रेषेमुळे विकास खुंटलाउल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा पाटबंधारे विभागाने निश्चित केली. मात्र ती नियंत्रण रेषा योग्य पद्धतीने आखण्यात आले नाही, असा दावा नागरिकांचा आहे. ज्या भागाला पुराचा धोका कधीच बसू शकत नाही तो भागदेखील पूर नियंत्रण रेषेच्या आत दाखवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

शासकीय मदत मिळेनाउल्हास नदीला पूर आल्यानंतर ज्या नागरिकांची घरे आणि दुकाने पाण्याखाली येतात त्यांचे पंचनामे करूनही बाधितांना मदत मिळत नाही.

इमारतींचा पुनर्विकास थांबला- नव्या पूर नियंत्रण रेषेमुळे उल्हास नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास थांबला. - हा संपूर्ण परिसर पूर्ण नियंत्रण रेषेत दाखवण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोकादायक इमारतीत राहण्याची वेळ आली. 

हेंद्रेपाडा हा भाग उल्हास नदीपासून जवळ असल्यामुळे जास्त पाऊस झाल्यास या भागातील अनेक घरे पाण्याखाली येतात. मात्र शासन स्तरावर त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.    - सिद्धेश हरवटे, बदलापूर 

पूर नियंत्रण रेषा निश्चित करताना जागेवर न येताच परस्पर गुगल मॅपवरच ही रेषा निश्चित करण्यात आली. त्यामुळे टेकडीवरचा भागदेखील पूर नियंत्रण रेषेत दाखवण्यात आला. या पूर नियंत्रण रेषेचे  नव्याने सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.    - मयूर मेहेर, बदलापूर

हेही एक कारणअनेकांचे संसार पाण्याखाली जातात तेव्हा प्रशासन दमडीही देत नाही. शासन, प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळण्याचे हेही एक सबळ कारण आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर