शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली भाताची पिके झोपविली, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 19:45 IST

परतीच्या पावसाने रोजच जोर धरला आहे. दररोज सायंकाळी पडणा-या जोरदार परतीच्या पावसामुळे भाताची शेतात उभी असलेली पिके जमीनीला टेकली आहे.

कल्याण : परतीच्या पावसाने रोजच जोर धरला आहे. दररोज सायंकाळी पडणा-या जोरदार परतीच्या पावसामुळे भाताची शेतात उभी असलेली पिके जमीनीला टेकली आहे. भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी केली आहे. 

भातशेतीला चांगला पाऊस लागतो. यंदाच्या वर्षी चांगला दमदार पाऊस झाल्याने भातशेती करणारा शेतकरी सुखावला होता. चांगल्या पावसामुळे शेतक-यांनी चांगल्या प्रकारे भात पेरणी केली होती. अपेक्षेप्रमाणो शेतात भाताची पिके डुलू लागली. परतीच्या पावसाने अद्याप पाठ सोडलेली नाही. शेतात उभी असलेली पिके परतीच्या पावसाने झोपविली आहेत. त्यामुळे भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. ठाणो जिल्ह्यात केवळ भातशेती केली जाते. या ठिकाणी एकच हंगामात पिके घेतली जातात. खरीपाचा हंगाम हा शेतक:यासाठी महत्वाचा असतो. एकमेव खरीप हंगामातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात जवळपास 5 हजार 900 हेक्टर शेतजमीनीवर भात शेती केली जाते. त्यातून दरवर्षी 2 हजार टन भात पिकवला जातो. ङिनी, तोरणा, कर्जत, जया, वाडा कोलम या भाताच्या जाती पिकविल्या जातात. पिकविलेल्या भातशेतीतून जो काही भात तयार होतो. तो राईस मिलमध्ये पॉलिश करुन त्यातून काही भात हा शेतकरी घरी खायला तर उर्वरीत भाताच्या विक्रीतून त्याला नगदी उत्पन्न मिळते. भातशेतीतून त्याची दोन्ही गरजा भागतात. परतीच्या पावसाने शेतकरीच अडचणीत आला आहे. शेतात उभे असलेले पिक खळ्य़ात झोडणीसाठी जाण्यापूर्वीच शेतात जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच्या हाती काही लागणार नाही. कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

    विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी हा लहरी पावसामुळे अडचणीत येतो. त्यामुळे तो कजर्बाजारी होतो. त्याठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात. नुकतीच काही दिवसापूर्वी शेतकरी संपापश्चात शेतक-यांची समिती पाहणीसाठी ठाणो जिल्ह्यात आली होती. तेव्हा ठाणो जिल्ह्यातील शेतकरी किती अडचणीत आला तरी तो आत्महत्या करीत नाही असा मुद्दा शेतक-यांनी उपस्थित केला होता. मात्र ठाणो जिल्ह्यातील शेतक-यांना कजर्वाटपच झालेले नाही असा मुद्दा समोर आला होता. ओल्या दुष्काळामुळे भातशेती करणारा शेतकरी अडचणीत आल्याने तो आत्महत्या करु शकतो अशी भिती घोडविंदे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी