शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

शेतकऱ्यांना मिळेल लवकरच दिलासा- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 00:28 IST

राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे.

भिवंडी : राज्यात दुष्काळी स्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील गावांमध्येही सरकारी यंत्रणांकडून सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेनंतर दुष्काळात भरडलेल्या शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.तालुक्यातील चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा व भोईरगाव ते सावद नाका या रस्त्यांचे भूमिपुजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, दयानंद चोरघे, आर. सी. पाटील, देवेश पाटील आदी उपस्थित होते. भूमिपुजनानंतर पडघा येथे झालेल्या सभेत पाटील म्हणाले की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्वाधिक गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यादृष्टीने पाण्याचे स्त्रोत शोधले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारी यंत्रणांकडून पंचनामे झाल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यासाठी तीन टप्पे असतात. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना निश्चितच दिलासा मिळेल, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिले.तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांना १६७ कोटींचा निधी देण्यात आला. चावे-कुरु ंद-पडघा-भादाणे-चिराडपाडा या रस्त्यासाठी २९ कोटी ५० लाख आणि भोईरगाव ते सावद नाका रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला. राज्यातही सर्वाधिक रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यात २२ हजार किलोमीटरचे रस्ते तयार होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकासकामांसाठी २३ हजार कोटी रु पयांचा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील