शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

ठाणे जिल्ह्यातील ४१६ गांवांमधील महसूलच्या दप्तराची लवकरच ‘ई चावडी’ प्रणाली; अधिकार्यांना आँनलाईनचे धडे!

By सुरेश लोखंडे | Updated: November 4, 2022 22:01 IST

या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

ठाणे : महसूल विभागासंबंधीच्या कामकाजात एकसूत्रपणा येऊन सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसामान्यांसाठी ‘ई चावडी’ प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ गावांमधील महसूल दफ्तर अद्ययावत करण्याचे काम महसूल यंत्रणांनी प्राधान्याने करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज अधिकाºयांना दिले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचाºयांसाठी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ‘ई चावडी’ व ‘ई हक्क’ विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आज घेतली.  त्यावेळी उपस्थित अधिकाºयांना शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. ई फेरफार समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीविषयक प्रशिक्षण अधिकाºयांना दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, अविनाश शिंदे, अभिजित भांडे पाटील, जयराज कारभारी, बाळासाहेब वाकचौरे, रोहित राजपूत आदी उपस्थित होते.

या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी शिनगारे यांनी ई चावडी व ई हक्क प्रणालीचे महत्त्व विषद केले. या प्रणालीमुळे महसूल प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांनाची सोय होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गावांची माहिती ई चावडीसाठी आवश्यक अष्टसूत्रीनुसार अद्ययावत तातडीने सुरूवात करण्याचे आदेश शिनगारे यांनी देऊन मार्गदर्शन केले. येत्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच गावे ई चावडीवर येण्यासाठी प्रयत्न करू. राज्य शासनाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पुढील काळात याचा तालुका निहाय आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात संगणकिकृत सातबारा प्रकल्प राबविण्यात आला होता. आता शंभर टक्के ई फेरफार हे आॅनलाईन होत आहे. आता त्याची पुढची पायरी म्हणून ई चावडीद्वारे महसूलविषयक आकारणीची माहिती अद्ययावत होत आहे. ई हक्क प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या वारसा नोंद, ई करार, बोजा चढविणे, बोजा उतरविणे, मयताचे नाव कमी करणे, शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे ही कामे करता येणार आहेत. हस्तलिखित व संगणकिकृत सातबारामधील तफावत दूर करण्यासाठी ई हक्कद्वारे अर्ज करता येणार आहे. खातेदारांना त्यांची माहिती आॅनलाईन अद्ययावत करण्याची सोय यामध्ये देण्यात आल्याचे नरके यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे