शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काही तरी कर ठाणेकर, कधी होणार शहर स्मार्ट

By admin | Updated: October 28, 2015 23:00 IST

आरक्षित असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही.

घोडबंदर : आरक्षित असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही. हा रस्ता गेल्या ३० वर्षात होऊ शकलेला नसल्याने तो मोठा अडसर स्मार्ट सिटीच्या मार्गात बाधक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून वाहतुकीच्या समस्येवर आयकॉनिक प्रोजेक्ट उभे करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु आहे. यामध्ये मेट्रो, एमआरटीएस (मास रेल ट्रान्झीट सिस्टीम), एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झीट रोड), जलवाहतूक, पार्किंग प्लाझा, ओवळा डेपो सुधारणा अशा वाहतूक योजनांचा समावेश आहे.यापूर्वीच्या आयुक्तांनी रिंग रेल्वे, एलआरटी, बीआरटीएस, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची ठाणेकरांना दाखवलेली स्वप्ने विस्मरणात जात नाही तोच आता पुन्हा स्मार्ट सिटीच्या नावाने योजनांचा पाऊस पाडण्याचे धोरण पालिकेने हाती घेतल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून वेळोवेळी शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड विकसित करण्यास प्रशासनाला पूर्ण यश आलेले नाही. आराखड्यात असलेला रिंग रेल्वे मार्ग केला असता तरी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघाला असता. हा मार्ग मेंटल हॉस्पिटल, मुलुंड चेकनाका, रोड नंबर १६, २२, पोखरण रोड,पातलीपाडा बाळकुम, खारटन रोड, ठाणे स्टेशन असा आहे.गेली काही वर्षापासून मागणी असलेल्या विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनसाठी जागा उपलब्ध झालेली नाही.रिंग रेल्वेसाठी पाच कोटी खर्च करून योजना मागे पडली आहे. शासनाकडे मागणी केलेली मेंटल हॉस्पिटलची १७ एकर जागा ताब्यात आली नसल्याने कुठचीही योजना मार्गी लागू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे.परंतु प्रत्यक्षात निविदा काढल्यानंतर ती धावण्यासाठी सात वर्षांचा कालवधी लागेल. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्याचे भाग्य उजळण्यास दहा वर्षे लोटणार आहेत.