शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; पालकांना मदत कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 9:37 AM

Corona Virus : पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

- जगदीश भोवड

पालघर : जिल्ह्यामध्ये आजवर दुर्दैवाने जीवघेण्या कोरोना आजारात २ हजार १३८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांचे आधार गमावले गेले आहेत. यात एकमेव कमावता मुलगा गमावलेल्या कुटुंबांसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पालकांना मदत कोण करणार, हाच खरा प्रश्न आहे.

पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. परंतु कोरोनाने ज्यांचे एकमेव आधार हिरावून नेले, त्यांची कुटुंबे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे सरकारने आई-वडील मृण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु अशा कुटुंबांना कोण मदत करणार, असा सवाल हे हवालदिल पालक करताना दिसत आहेत.

आधार गमावलेल्या ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच...

एकमेव मुलगा अथवा मुलगी वारस असलेली अशी अनेक कुटुंबे जिल्ह्यामध्ये आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये अशा एकमेव आधार असलेल्या मुलगा अथवा मुलीचा बळी जाण्याचेही प्रकार घडलेले आहेत.

उतारवयात ज्यांचा आधार मिळेल, अशी हसती-खेळती कमावती लेकरे गमावलेल्या आई-वडिलांचे दुःख कोण दूर करणार? सरकार अशा निराधारांसाठी योजना जाहीर करणार आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे.

ज्या आई-वडिलांनी आपला एकमेव कमावता मुलगा अथवा मुलगी कोरोनामुळे गमावली आहे, अशा निराधार कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करणे नितांत गरजेचे आहे. शिवाय अशा कुटुंबांतील एका व्यक्तीला रोजगार देऊन त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे.- अरविंद देशमुख, वाडा तालुका अध्यक्ष, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था.

टॅग्स :palgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस