शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

Corona Virus : एकमेव आधार कोरोनाने नेला; पालकांना मदत कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 09:37 IST

Corona Virus : पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

- जगदीश भोवड

पालघर : जिल्ह्यामध्ये आजवर दुर्दैवाने जीवघेण्या कोरोना आजारात २ हजार १३८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेकांचे आधार गमावले गेले आहेत. यात एकमेव कमावता मुलगा गमावलेल्या कुटुंबांसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पालकांना मदत कोण करणार, हाच खरा प्रश्न आहे.

पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. परंतु कोरोनाने ज्यांचे एकमेव आधार हिरावून नेले, त्यांची कुटुंबे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे सरकारने आई-वडील मृण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु अशा कुटुंबांना कोण मदत करणार, असा सवाल हे हवालदिल पालक करताना दिसत आहेत.

आधार गमावलेल्या ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच...

एकमेव मुलगा अथवा मुलगी वारस असलेली अशी अनेक कुटुंबे जिल्ह्यामध्ये आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये अशा एकमेव आधार असलेल्या मुलगा अथवा मुलीचा बळी जाण्याचेही प्रकार घडलेले आहेत.

उतारवयात ज्यांचा आधार मिळेल, अशी हसती-खेळती कमावती लेकरे गमावलेल्या आई-वडिलांचे दुःख कोण दूर करणार? सरकार अशा निराधारांसाठी योजना जाहीर करणार आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे.

ज्या आई-वडिलांनी आपला एकमेव कमावता मुलगा अथवा मुलगी कोरोनामुळे गमावली आहे, अशा निराधार कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करणे नितांत गरजेचे आहे. शिवाय अशा कुटुंबांतील एका व्यक्तीला रोजगार देऊन त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे.- अरविंद देशमुख, वाडा तालुका अध्यक्ष, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था.

टॅग्स :palgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस