शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सौरऊर्जेद्वारे ठिबक पद्धतीने १५ हजार झाडांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:57 IST

आंबिवलीच्या टेकडीवर केडीएमसीकडून रोपण : तीन वर्षांनंतर पक्षी अभयारण्य बनविण्याचा मानस

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने आंबिवलीच्या टेकडीवर १५ हजार झाडे लावली असून, ती सगळी झाडे जगली आहेत. या झाडांना सौर ऊर्जेच्या आधरे ठिबक पद्धतीने दररोज पाणी दिले जाते. तेथे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. एका वर्षात चार ते पाच फूट उंच झाडे वाढली आहेत. भविष्यात येथे पर्यटनस्थळ व पक्ष्यांचे अभयारण्य उभारण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली आणि उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी पत्रकारांचा पाहणीदौरा आयोजित केला होता. यावेळी कोळी-देवनपल्ली यांनी वरील माहिती दिली.महापालिका एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंगरोड विकसित करत आहेत. या प्रकल्पात महापालिका हद्दीतील जवळपास दोन हजार १०० झाडे तोडण्यात येणार आहे. सध्या या रस्त्याचे दुर्गाडी ते टिटवाळा टप्प्यातील काम सुरू आहे. एखादा प्रकल्प राबवताना त्यात बाधित होणारी झाडे तोडण्यात येतात. मात्र, त्या बदल्यात पाच पटीने झाडे लावली जात नाही. त्यामुळे रिंगरोडसाठी झाडे तोडण्यापूर्वीच आंबिवली येथील ३८ एकर जागेत झाडे लावण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला. वनखात्याने त्यासाठी ३८ एकर जागा वृक्षारोपणास देण्याचे मान्य केल्यावर महापालिकेने एमएमआरडीए सोबत सामंजस्य करार केला. एमएमआरडीएने त्यासाठी महापालिकेस दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून ही झाडे लावली आहेत.

तीन बाय तीन मीटरच्या अंतराने बकूळ, आंबा, कडूनिंब, पेरू, मोहराणी, जांभूळ, टबेबुआ, चेरी, कदंब, कांचन, बदाम, सातवीन, वड, पिंपळ, ताम्हण, अर्जुन काजू, शिसव, फणस, चिंच, कैलासपती, खाया, बहावा आदी झाडे २०१८ मध्ये पावसाळ्यात लावण्यात आली आहेत.पुढील तीन वर्षांत तेथे जंगल उभे राहू शकते. त्यामुळे तेथे भविष्यात पक्षी अभयारण्य तयार करण्याचा मानस कोळी-देवनपल्ली यांनी व्यक्त केला आहे.

स्वयंचलित यंत्रणाझाडे लावण्याचे काम दिलेल्या कंत्राटदारावरच झाडे जगवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. किमान तीन वर्षे एकही झाड मरण पावणार नाही, अशी अट संबंधित कंत्राटदाराला घातली आहे. टेकडीच्या पायथ्याशी तीन विहिरी वर्षा जलसंचयनातून तसेच एक बोअरवेल खोदली आहे. या बोअरवेलमधून सौरऊर्जा पॅनलद्वारे प्रत्येक झाडाला ठिबक पद्धतीने पाणी दिले जात आहे. या पद्धतीने एका तासाला सहा लीटर पाणी एका झाडाला दिले जात आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत पाणी ठिबक पद्धतीने दिले जाते. ही पाणी देण्याची यंत्रणा स्वयंचलित आहे. त्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. त्यासाठी मनुष्यबळाचा वापर कमी करण्यात आला आहे.