शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

उल्हासनदीच्या स्वच्छतेसाठी समाज माध्यमाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:55 IST

४० युवक आले एकत्र : दर रविवारी राबवली जाते मोहीम

पंकज पाटील

बदलापूर : सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येतो याचा प्रत्यय बदलापूरमध्ये आला आहे. बदलापुरातून वाहणारी उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी एका युवतीने फेसबुकवर आवाहन करत नदी स्वच्छ करण्यासाठी एकत्रित येण्याची विनंती केली होती. या विनंतीला तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला. दर रविवारी सकाळी या तरूणांच्यावतीने उल्हास नदी परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे.

बदलापूरमधील पूजा टांकसाळकर या तरूणीने आपल्या फेसबुकव अकाऊंटवरून उल्हास नदी स्वच्छतेसाठी आवाहन केले होते. दर रविवारी तरूणांनी एकत्रित येत बदलापूरातील उल्हास नदी आणि परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. फेसबुकवरील आवाहनानंतर पहिल्या रविवारी सत्कर्म आश्रमातील १५ विद्यार्थी आणि फेसबुकवरील संदेश पाहून १० तरूण एकत्रित आले. या सर्व तरूणांनी एकत्रितपणे बदलापूर चौपाटी परिसरातील सर्व कचरा, प्लास्टिक,दारूच्या बाटल्या उचलण्याचे काम हाती घेतले आहे. या परिसरातील सर्व घाणही काढण्याचे काम हाती घेतले आहे.

उल्हासनदीच्या किनाऱ्यावर अनेक मद्यपी रात्रीच्यावेळी दारू पिऊन बाटल्या फेकतात. या सर्व बाटल्या उचलून त्या परिसराची स्वच्छता केली जात आहे. अनेक नागरिक या भागात रात्रीच्यावेळी जेवणासाठी येतात. सर्व खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर उरलेले अन्न आणि तो कचरा तसाच टाकून निघून जातात. सततच्या प्रकारामुळे या भागात नियमित मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्यामुळे नदीच्या प्रदूषणातही वाढ होत आहे. उल्हासनदीच्या तीरावर तयार केलेल्या चौपाटीच्या स्वच्छतेसोबत नदी पात्रात जाणारा कचरा रोखण्याचा प्रयत्न या तरूणांनी सुरू केला आहे. पहिल्या दिवशी मोजकेच तरूण आले असले तरी या संदर्भात आणखी माहिती घेतल्यावर दुसऱ्या रविवारी तब्बल ४० तरूण या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्रित आले.तरूणांनी दिलेली साथ यामुळे परिसरातील सर्व कचरा बाहेर काढण्यास मदत होते. पहिल्या दिवशी या तरूणांना परिसरात ४२ दारूच्या बाटल्या आणि दुसºया रविवारी तब्बल ५५ दारूच्या बाटल्या मिळाल्या. त्यावरून या परिसरात नागरिकांसोबत तळीरामांचाही वावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न तरूण करत आहे. कचरा गोळा करताना मिळालेल्या दारूच्या बाटल्या विकून जी रक्कम जमा होणार आहे त्यात आणखी भर टाकून भिंती रंगविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी तरूणांची फळी मदत करेल असा विश्वास पूजा हिने व्यक्त केला.तरूणांना जोडण्याचा अधिक प्रयत्नस्वच्छतेची ही मोहीम अविरतपणे सुरू राहणार असून जास्तीतजास्त तरूण या उपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.राजकीय हस्तक्षेप न ठेवता बदलापूरमधील तरूणांना सामाजिक भान लक्षात घेऊन संघटित करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या निमित्ताने केले जात आहे.या अनोख्या उपक्रमात जास्तीतजास्त तरूणांनी एकत्रित येण्याचे आवाहन टांकसाळकर यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेPlastic banप्लॅस्टिक बंदीriverनदी