शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

By जितेंद्र कालेकर | Updated: October 28, 2022 14:16 IST

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी प्रा. नीता व मुलगा निमिष  असा परिवार आहे.

संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते.  त्यांनी आणीबाणी विरोधी कार्यापासून सामाजिक , राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले,ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते.ते एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगड मधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते.जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतीशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात एन.डी. सरांच्या सोबत निमंत्रक म्हणून काम केले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे विश्वस्त होते. त्यांचा विचारवेध संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. वडघर ( माणगाव) येथे झालेल्या तेराव्या विचारवेध संमेलनाचे ते संयोजक होते.  त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले होते.

वर्ल्ड सोशल फोरम या मुंबईतील कार्यक्रमाचे संयोजक, ठाण्यातील मतदार जागरण अभियानाचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी स्वराज्य इंडिया अभियानतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये 'बळीराजांची मुले मुली' हा कार्यक्रम घेऊन प्रबोधनाचेही त्यांनी काम केले. 

ते ठाणे येथील वी नीड यू सोसायटीचे सदस्य व कार्याध्यक्ष होते. त्यांनी संस्थेतर्फे पैसे गोळा करून कोरोना काळात कष्टकरी असंघटित वर्गातील सातशे लोकांना एकंदर सहा महिने दररोज जेवण दिले.त्यांनी कोरोना काळात पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी मानधन गोळा करून अर्थसाह्य प्रकल्पही सुरू केला होता. 

त्यांनी चळवळी आणि आंदोलनाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचे लिखाणतसेच वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांनी सेवाग्राम कलेक्टिव्ह तर्फे महाराष्ट्रातील पूर्णवेळ शंभर सामाजिक कार्यकर्यांना गांधींजीं विषयी तीन खंड व डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांचे मुलांसाठी विवेकानंद आदी विचार प्रवर्तक पुस्तकांच्या प्रती पाठवण्यात पुढाकार घेतला होता. संजीव साने यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्यासोबत पुणे येथील  महात्मा फुले वाडा ते गांधींचा वर्ध्याचा आश्रम ' महात्मा ते महात्मा' या ऐतिहासिक पदयात्रेचे  संयोजनात सहभाग घेतला होता. 

संजीव साने यांनी रेमिंग्टन या टाईपरायटर कंपनीत नोकरी केली. मालकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही कर्मचारी कंपनी चालवू असा प्रस्ताव देऊन काही काळ कंपनी चालविली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आल्याने ही कंपनी बंद झाली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्यात झोकून दिले. त्यांनी आप पार्टीच्या वतीने ठाणे लोकसभा निवडणूक लढवली होती. साने यांना वर्धा येथील दाते संस्थेचे वतीने डॉ.भा.ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे