शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

... तर नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात -आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:21 IST

Relationships : महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले.

ठाणे  - महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले. जमाखर्चाचा हिशोब संपला की नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात तसेच, शिक्षक- मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्यामधले नाते हे कधीही संपत नाही असे ते म्हणाले.जोशी- बेडेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, तत्त्वज्ञान विभाग आणि समुपदेशन कक्ष यांनी मंगळवारी विविध वर्गांचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक मेंटर्ससाठी मेंटर्सशिपवर एका ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. आधारातून गुणवत्तेकडे असे या कार्यशाळेचे नाव होते. नाडकर्णी व एसएनडीटी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि समुपदेशक डॉ. अनुराधा सोवनी हे या कार्यशाळेतील मुख्य वक्ते होते.सकारात्मक बदल घडविण्यासाठी मेंटर्सनी कार्यरत राहणे यावर नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सकारात्मक बदल घडवून आणण्याबाबत आपले विचार व्यक्त करताना त्यांनी गुरू- शिष्यांमधले नाते हे कधीच संपत नाही, असेही शेवटी सांगितले. प्राचार्या व तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. सुचित्रा नाईक यांनीही विचार व्यक्त केले. कार्यशाळेत सुमारे ९८ शिक्षक व मार्गदर्शक सहभागी झाले होते. अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाच्या समन्वयक डॉ. रश्मी अग्निहोत्री यांनी प्रारंभी महाविद्यालयातील सध्याची मेंटरिंग प्रणाली व त्याचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेचा समारोप पसायदानाने करण्यात आला. अनुराधा सोवनी यांचे मार्गदर्शन मेंटरिंग ही औपचारिक आणि मोजमाप करता येईल अशी प्रणाली म्हणून विकसित करणे यावर डॉ. अनुराधा सोवनी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनाची प्रणाली बळकट करण्यासाठी तसेच त्याची औपचारिक नोंद करण्यासाठी संस्थेच्या विविध भागधारकांबरोबर जसे की विद्यार्थी, माजी विद्यार्थी इत्यादी. सहयोगात्मक उपक्रम आयोजित करण्यावर भर दिला. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपthaneठाणे