शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

...तर ५४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन बंद?, केवायसीची अंतिम मुदत बुधवारपर्यंत

By सुरेश लोखंडे | Updated: August 29, 2022 09:08 IST

PM Kisan Sanman: केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे.हयातीची माहिती आवश्यक हयात असल्यासह विविध स्वरूपाची माहिती जिल्ह्यातील या पेन्शन लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीच्या स्वरूपात नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत शेवटची मुदत होती. त्यात आणखी मुदतवाढ देण्यात आली हाेती. आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याच्या वृत्तास जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत या शेतकऱ्यांचे पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वालाख लाभार्थी आहेत. त्यातील बहुतांशी शेतकरी ‘कर’ भरणारे धनवान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या पेन्शनची रक्कम वसूल करण्याची कारवाई याआधीच सुरू केली आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे. त्वरित ई-केवायसी कराकेंद्र शासनाच्या या सहा हजारांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हयात असल्यासह अन्य माहिती यंदा शेतकऱ्यांनी नोंद करण्याची अट घातली होती. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या माहितीचे केवायसी संबंधित कृषी विभागाकडे, यंत्रणेकडे नोंद करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना या पेन्शनच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागणार असल्याचे कुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाthaneठाणे