शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

...तर ५४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन बंद?, केवायसीची अंतिम मुदत बुधवारपर्यंत

By सुरेश लोखंडे | Updated: August 29, 2022 09:08 IST

PM Kisan Sanman: केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : केंद्र शासनाने पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची पेन्शन तब्बल तीन टप्प्यांत मिळत आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे.हयातीची माहिती आवश्यक हयात असल्यासह विविध स्वरूपाची माहिती जिल्ह्यातील या पेन्शन लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीच्या स्वरूपात नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत शेवटची मुदत होती. त्यात आणखी मुदतवाढ देण्यात आली हाेती. आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याच्या वृत्तास जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत या शेतकऱ्यांचे पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वालाख लाभार्थी आहेत. त्यातील बहुतांशी शेतकरी ‘कर’ भरणारे धनवान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या पेन्शनची रक्कम वसूल करण्याची कारवाई याआधीच सुरू केली आहे. पात्र, ठरलेल्या काही शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. हयातीचा दाखला आणि अन्य माहितीसह ई-केवायसी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. आता ३१ ऑगस्टपर्यंत केवायसीची ही कमी भरून न काढल्यास या शेतकऱ्यांची बुधवारपासून पेन्शन बंद होणार आहे. त्वरित ई-केवायसी कराकेंद्र शासनाच्या या सहा हजारांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हयात असल्यासह अन्य माहिती यंदा शेतकऱ्यांनी नोंद करण्याची अट घातली होती. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या माहितीचे केवायसी संबंधित कृषी विभागाकडे, यंत्रणेकडे नोंद करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना या पेन्शनच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागणार असल्याचे कुटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाthaneठाणे