शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भाजपाच्या नाकावर टिच्चून सेनेने केले ‘स्मार्ट मीटर’ मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:28 IST

स्मार्ट मीटरच्या मुद्यावरून बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरची योजना इतर महापालिकांत अपयशी असताना ती ठाण्यात राबवण्यास भाजपा नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला.

ठाणे : स्मार्ट मीटरच्या मुद्यावरून बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरची योजना इतर महापालिकांत अपयशी असताना ती ठाण्यात राबवण्यास भाजपा नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. तरीही भाजपाच्या नाकावर टिच्चून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने प्रस्तावाला पाठिंबा मिळवून तो बहुमताने मंजूर केला. ही योजना सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपयुक्त असून हे मीटर बसवल्यानंतर ३७ टक्के पाणीगळती पाच टक्क्यांवर येणार आहे. असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.११ वर्षांपासून नळजोडण्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याची केवळ घोषणा करत असलेल्या महापालिकेने अखेर ते बसवण्याचा निर्णय पुन्हा घेतला असून, स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत आलेला निधी त्यावर खर्च केला जाणार आहे. मीटर खरेदीपासून ते बसवण्यापर्यंतचा सर्व खर्च हा त्यातून केला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी याचा खर्च ठाणेकरांकडून घेण्याचा निर्णय आता रद्द झाला आहे.यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पटलावर आला असता त्यावर भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शंका उपस्थित केल्या. मुंबई, नवी मुंबई तसेच इतर महापालिकांत हा प्रयोग अपयशी ठरला असताना ठाण्यात ही योजना का राबवली जात आहे, असा मुद्दा उपस्थित करून आधी प्रायोगिक तत्त्वावर ती राबवून त्यानंतर शहरात सर्व ठिकाणी ती अमलात आणावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक विकास रेपाळे तसेच परिषा सरनाईक यांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या बाजूने मत व्यक्त केले. या योजनेमध्ये काळेबेरे असेल, तर प्रशासनाने किंवा कृष्णा पाटील यांनी खुलासा करावा, अशी मागणी म्हस्के तसेच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली. अखेर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी आक्र मक भूमिका घेऊन गळती कमी होईल, असे स्पष्ट केले. मिलिंद पाटील यांनी हा ठराव मांडला व नरेश म्हस्के यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.गळती कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न -शहरातील सर्व नळजोडण्यांवर मीटर बसवण्यात येणार असले तरी पाणीगळती कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी वेगळ्या बजेटची तरतूद केली असल्याची माहिती उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी सभागृहात दिली. ज्या भागात सध्या पाणी येत नाही, ते पॉकेट शोधून त्या भागातील गळती थांबवण्यात येणार आहे. याशिवाय, जुन्या जलवाहिन्या बदलणे, दुरु स्त करणे अशी महत्त्वाची कामेदेखील केली जाणार असल्याचे खडताळे यांनी सांगितले.आयुक्तांच्या अधिकारांवरमात्र माजी महापौरांचा आक्षेपशासनाच्या नव्या नियमावलीनुसार सभागृहाच्या परवानगीशिवाय पाणीपट्टीकरात पाच टक्के करवाढ करण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. मात्र, या नियमाला माजी महापौर अशोक वैती यांनी आक्षेप घेतला. सभागृहाची मान्यता नसेल, तर प्रशासनाकडून कशाप्रकारे निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या नियमाला विरोध करण्यात आला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा