शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

वायुप्रदूषणाचे ‘स्लो पॉयझनिंग’ घातक

By admin | Updated: November 17, 2016 06:57 IST

मागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत

मुरलीधर भवार / कल्याणमागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना श्वास कोंडण्याचा त्रास होतो. वेळीच या समस्येवर उपाय केले नाहीत, तर या स्लो पॉयझनमुळे या परिसरातील लोकांचे आयुर्मान कमी होत जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.ठाणे, दिवा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण-शीळ रोड, कल्याण-भिवंडी, शीळ, ठाणे-शीळ या परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. ठाणे-कल्याण मार्गावर रेल्वे प्रवास करताना दिवा स्थानक येताच प्रवाशांचा श्वास गुदमरू लागतो. दिवा परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर दररोज कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी धुराने वेढलेला असतो. आता थंडीला सुरुवात झाली आहे. पहाटे धुक्याचे प्रमाण जास्त असते. या धुक्याचा गैरफायदा घेत कचरा जाळल्याने धुराचे लोट हवेत जातात. धुके आणि धूर याबाबत दिवावासीयांचा संभ्रम होतो. कचरा जाळण्यावर कोणत्याही सरकारी यंत्रणांचे नियंत्रण नाही. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील विविध दगडखाणींमधील क्रशरमुळे वातावरणात धुलीकणांचे प्रमाण वाढते आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर धुळीचे प्रमाण इतके आहे की, दुचाकीवरील प्रवासी महिला व पुरुष तोंडाला स्कार्फ बांधल्याखेरीज प्रवास करू शकत नाहीत. डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीमधील कारखानेही धुक्याचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात विषारी वायू सोडतात. रासायनिक कंपन्या योग्य प्रक्रिया न करतासांडपाणी नाल्यात सोडतात. त्याचा दर्प इतका भयानक असतो की, त्यामुळेही नागरिकांना त्रास होतो. डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात ही समस्या तीव्र आहे. केडीएमसीच्या हद्दीत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ३५ वर्षांपासून गाजत आहे. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात अद्याप महापालिकेस यश आलेले नाही. या डम्पिंगचा उग्र, घाण वास कल्याण स्टेशन परिसरापर्यंत येत असतो. तसेच डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक नाक मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. डम्पिंगवर लागलेल्या आगीचा धूर नागरिकांच्या नाकातोंडात जातो. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कल्याण, डोंबिवली, दिव्याबरोबर भिवंडीतही आहे. तेथेही डम्पिंगची व्यवस्था नाही. उल्हासनगर महापालिकेने व अंबरनाथ-बदलापूर पालिकांनीही डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेचा प्रकल्प उभारलेला नाही. वालधुनी नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्या पाण्याचा उग्र दर्प अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणच्या नागरिकांना सहन करावा लागतो. तोच प्रकार डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळून वाहणारा नाला खंबालपाडामार्गे ठाकुर्ली रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत मिळतो, तेथेही आहे.