शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरात इमारतींचें स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच, १५ दिवसात १२ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:51 IST

उल्हासनगरात सन १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने, बहुतांश बांधकामे वालवा रेती व दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाले. याच दरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतीचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.

उल्हासनगर : कॅम्प नं-२, नेहरू चौक, बडोदा बँकेसमोरील साईशक्ती या ५ मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तळमजल्यावर कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला. इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपर्यंत संबंधित इमारतीच्या स्लॅबचा ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केले. (Slabs collapse continues in Ulhasnagar, 12 killed in 15 days)

उल्हासनगरात सन १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने, बहुतांश बांधकामे वालवा रेती व दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाले. याच दरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतीचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत. गेल्या १० वर्षात ३३ इमारतीचे स्लॅब कोसळून ४२ पेक्षा जास्त जणांचा बळी गेले. कॅम्प नं-२ मधील साईशक्ती इमारतीचा पाचवा मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडला. यात ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना सांगण्यात आली. रात्री उशीरा पर्यंत अग्निशमन जवानांनी ढिगाऱ्या खालून ५ मृतदेह काढल्या नंतर त्यांच्या मदतीला ठाणे टीडीआरएफ टीम धावली. या ढिगाऱ्याखालून एकून ७ मृतदेह काढण्यात आले तर एक जण जखमी झाला. इमारतीत अथवा ढिगाऱ्या खाली कोणीही व्यक्ती नसल्याची खात्री झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्री संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार कुमार आयलानी,आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते. 

जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याचे नाव अलगोत नायडर (६०) असे आहे. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव पुनीत बजोमल चांदवाणी (१७), दिनेश बजोमल चांदवाणी (३५), दीपक बजोमल चांदवाणी- (४२), मोहिनी बजोमल चांदवाणी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), अमृता मूलचंद बजाज (४६) व लवली बजाज (२१) अशी आहेत. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. प्लॉट नं-३०४ व ४०४ खाली होते तर २०२ प्लॉटमधील नागरिक बेडरूममध्ये असल्याची महिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलून शहरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत बोलून सकारात्मक निर्णय आणण्याचे आश्वासन दिले. 

इमारतीमधील १५ कुटुंब थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जण मृत्यू पावल्याने, इमारत रात्री सील केली. एकून २९ प्लॉट पैकी अर्धेअधिक प्लॉट रिकामे असून इतर कुटुंबांना थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली. इमारतीमध्ये अडकलेल्या दागिन्यासह संसार उपयोगी साहित्य काढण्यास बेघर कुटुंबांना आज परवानगी दिली.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseइमारत दुर्घटनाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना