शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उल्हासनगरमध्ये सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 09:46 IST

उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी झालेली नाही.

सदानंद नाईक

उल्हासनगर - उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी झालेली नाही. शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने इमारतधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमध्ये इमारत कोसळण्याचे व स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असल्याने जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्यात 12 पेक्षा जास्त इमारती महापालिकेने खाली केल्याने शेकडो कुटुंब बेघर झाले. त्यांच्यावर घर देता का घर म्हणण्याची वेळ आली. मंगळवारच्या महासभेत धोकादायक इमारतीवर चर्चा होऊन कोसळलेल्या व धोकादायक झालेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या  प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-1 येथील 3 मजल्याच्या सचदेव कॉम्प्लेक्स इमारती मधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडल्याने इमारती मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारती मधील 5 कुटुंबाना सुरक्षित बाहेर काढले. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी इमारतीला भेट देऊन कुटुंबाची विचारपूस केली. गेल्या मंगळवारी 5 मजल्याची महेक इमारत पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. इमारत कोसळण्याच्या आदल्या दिवसी इमारत खाली केल्या 31 कुटुंबातील 150 जणांचा जीव वाचला. इमारती मधील स्लॅब कोसळण्याच्या सत्राने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगरमधील महेक इमारत याआधी मंगळवारी (13 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली होती. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ही इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन, इमारतीचा अहवाल येई पर्यंत इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी इतरांची मागणी न ऐकता इमारत सीलबंद करून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मज्जाव केला होता. महापालिका आयुक्त देशमुख व सहाय्यक आयुक्त कुमावत यांचा निर्णय अखेर योग्य ठरून 31 कुटुंबांचा जीव वाचला. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना