शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 15:25 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली. 

कल्याण- आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली. डम्पिंग ग्राऊंड हटाव संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविंद्र कपोते, देवानंद भोईर, कांचन कुलकर्णी, प्रिया शर्मा, मनिषा डोईफोडे, निशा करमरकर, पत्रकार विशाल वैद्य आदी विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिष्टमंडळाने नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. आयुक्त बोडके यांनी माझा पहिलाच दिवस आहे. मात्र या समस्येविषयी सखोल माहिती घेऊन येत्या बुधवारी डम्पिंगची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिलं आहे. नागरिकांना डम्पिंगचा त्रास होतो. तो दूर करण्यासाठी तातडीने कोणती उपाययोजना करायची याला प्राधान्य दिले जाईल. नागरीकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यावर माझा भर अधिक राहणार आहे. शिष्टमंडळाने सांगितले की, डम्पिंगची आग विझविण्यासाठी 50 पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे टँकर वापरले. त्यामुळे हाजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झालेली आहे. डम्पिंगचा वास अतिशय उग्र असल्याने कल्याण स्टेशनपर्यंत वास येतो. केवळ परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत नाही. तर वाऱ्याने हा वास टिटवाळा, डोंबिवली ठाकुर्लीपर्यंत पसरतो याकडे नागरीकांनी लक्ष वेधले. डम्पिंग बंद करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता महापालिकेस करता येत नसल्यास नागरीकांनी कुठे दाद मागायची असा प्रश्न शिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर धनराज खातमकर आणि आर. डी. शिंदे हे आयुक्त असताना त्यांनी डंपिंगमच्या कच:यातून निघणाऱ्या मिथेन वायूवर उपाययोजना केली होती. त्यानंतर नागरीकांना होणारा त्रस कमी झाला होता. त्यांच्या पश्चात डंपिंगला आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. डंपिंगला आग मिथेन वायूने लागत नसून ती लावली जाते असा आरोप शिष्टमंडळाने केला. टिटवाळा आणि डोंबिवलीचा कचरा आधारवाडी येथे टाकण्यात येऊ नये. शहरात अन्य ठिकाणी डंपिंगची किती आरक्षणो आहेत. ही आरक्षणो का विकसीत केली गेली नाही. प्रशासनातील कोणते अधिकारी त्याला जबाबदार आहे. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई का केली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला.