शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:39 IST

निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची भीती : कुरघोडीची व्यक्त केली शंका

जितेंद्र कालेकर

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्फोटकांची मोटार आणि याच मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्र सरकारची राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे यापूर्वीच हा तपास सोपविला होता. गेल्या वर्षभरापासून केंद्र व राज्य सरकारकडून आपापल्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा परस्परविरोधी वापर सुरू आहे. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाला राजकीय रंग लाभण्याची भीती त्यांचे नातलग व निवृत्त पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची मोटार मिळणे आणि त्याच मोटारीच्या मालकाचा कालांतराने संशयास्पद मृत्यू होणे या दोन्ही घटना एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळेच या घटनांचा तपास कोणत्याही एका संस्थेने त्यातही एटीएससारख्या तपास संस्थेने करणे आवश्यक आहे. अन्यथा, या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडे तपास गेल्यामुळे दोन्ही यंत्रणांमध्ये पर्यायाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. हिरेन यांच्या मृत्यूनंतर लागलीच भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. आता या प्रकरणाचा तपास केंद्राने आपल्याकडे घेतला तर राज्य सरकारवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न एनआयएच्या माध्यमातून केला जाईल, अशी भीती काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्फोटके सापडणे व हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या परस्परांशी संबंधित घटना असल्यामुळे याचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत व्हायला नको. इतकेच काय, त्यासाठी पोलीस उपायुक्त पातळीवरील अधिकारी एकच हवा, असे मत एकेकाळी ठाणे, मुंबईतील गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेल्या एका वरिष्ठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.  याच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील टीमने ठाणे, मुंबईतील सुरेश मंचेकर, छोटा राजन आणि छोटा शकील या गँगस्टर्सच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या होत्या. 

स्फोटकांच्या मोटारीचा तपास एनआयएकडे जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, तर सुरुवातीपासूनच हा तपास एनआयएकडे दिला जावा, असा आग्रह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. दरम्यान, हा संपूर्ण तपास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एटीएसकडे सोपविला.  मोटारीचे मालक हिरेन यांच्या गूढ मृत्यूवरून राजकारण चांगलेच तापले. मनसुख यांचा नाहक बळी गेल्यामुळे कुटुंबीयांच्या मागणीवरून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणे पोलिसांकडून एटीएसकडे सोपविण्यात आला. कदाचित हा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  दोन्ही यंत्रणांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वारंवार संघर्ष चिघळण्याची चिन्हे अधिक आहेत. 

‘मृत्यूचे कारण उघड होणार नाही’स्फोटक प्रकरण व हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणावरून राज्य व केंद्र सरकार समोरासमोर उभे ठाकले तर हिरेन यांच्या मृत्यूचे खरे कारण कधीच उघड होणार नाही. कुरघोडीच्या राजकारणात या विषयावरून राजकारण होईल, अशी शंका हिरेन यांचे नातलग व्यक्त करतात.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण