शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी रेल्वेपुलाच्या भुमीपुजनाचया कामावरुन शिवसेना भाजपात श्रेयाचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:44 IST

कोपरी पुलाचे काम सुरु करण्यासाठी मीच पाठपुरावा केल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यामुळेच भुमीपुजनाच्या निमित्ताने या दोघांमध्ये श्रेयाचे राजकारण तापल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअखेर कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचा मंगळवार पासून सुरवातशिवसेना, भाजपात रंगला कलगीतुरा

ठाणे - ठाणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या कोपरी रेल्वेपुलाच्या रु ंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. परंतु या भुमीपुजनाच्या आणि एकूणच या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन आता शिवसेना आणि भाजपात श्रेयाचे राजकारण तापले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर या दोघांनी याबाबत दावा केल्याने श्रेयाचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे.             कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम हे मागील १७ वर्षे रखडले होते. या पुलाचे काम सुरु व्हावे यासाठी यापूर्वी पासूनच राजकारण पेटले होते. कधी पालकमंत्री एकनाथ शिंदे तर कधी आमदार संजय केळकर यांच्यात श्रेयाची लढाई सुरु असल्याचे दिसून आले. या पुलाचा सुरवातीला खर्च ९ कोटी होता. परंतु आता त्याच कामासाठी २०० कोटींहून अधिकच खर्च केला जाणार आहे. असे असले तरी या खर्चाच्या मुद्यावरुन भांडण करण्यापेक्षा श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी या पुलाच्या कामाचे भुमीपुजन केले जाणार होते. त्यासाठी सर्वच वृत्तपत्रामंध्ये जाहीराती प्रसिध्द झाल्या. परंतु त्या जाहीरातींमध्ये देखील पालकमंत्र्यांना डावलण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असतांना त्यांनाच डावलण्यात आल्याने सोमवारी कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चा उधाण आले होते.दरम्यान कार्यक्रम सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. परंतु एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांच्या मागे धावत जावे लागल्याचे चित्रही दिसून आले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. परंतु आता या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन शिवसेना भाजपामध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. शहराच्या विविध भागात पालकमंत्री आणि भाजपाच्या आमदारांचे फलक लागले आहेत. यामध्ये दोघांनीही आपल्या परीने श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात या पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आता किती प्रयत्न होतात हे पाहणे महत्वाचे असतांना केवळ आमच्यामुळेच हे काम सुरु झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या दोघांनीही पुलासाठी कशाप्रकारे कोणत्या सालापासून पाठपुरावा सुरु केला याचे प्रमाण देखील लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून दिले आहे. असो कोणाच्याही प्रयत्नाने हे काम सुरु झाले असले तरी ते काम वेळेत पूर्ण व्हावे हीच इच्छा समस्त ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेmmrdaएमएमआरडीएtmcठाणे महापालिका