शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कोपरी रेल्वेपुलाच्या भुमीपुजनाचया कामावरुन शिवसेना भाजपात श्रेयाचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:44 IST

कोपरी पुलाचे काम सुरु करण्यासाठी मीच पाठपुरावा केल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यामुळेच भुमीपुजनाच्या निमित्ताने या दोघांमध्ये श्रेयाचे राजकारण तापल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअखेर कोपरी रेल्वे पुलाच्या कामाचा मंगळवार पासून सुरवातशिवसेना, भाजपात रंगला कलगीतुरा

ठाणे - ठाणेकरांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या कोपरी रेल्वेपुलाच्या रु ंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. परंतु या भुमीपुजनाच्या आणि एकूणच या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन आता शिवसेना आणि भाजपात श्रेयाचे राजकारण तापले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर या दोघांनी याबाबत दावा केल्याने श्रेयाचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे.             कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम हे मागील १७ वर्षे रखडले होते. या पुलाचे काम सुरु व्हावे यासाठी यापूर्वी पासूनच राजकारण पेटले होते. कधी पालकमंत्री एकनाथ शिंदे तर कधी आमदार संजय केळकर यांच्यात श्रेयाची लढाई सुरु असल्याचे दिसून आले. या पुलाचा सुरवातीला खर्च ९ कोटी होता. परंतु आता त्याच कामासाठी २०० कोटींहून अधिकच खर्च केला जाणार आहे. असे असले तरी या खर्चाच्या मुद्यावरुन भांडण करण्यापेक्षा श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी या पुलाच्या कामाचे भुमीपुजन केले जाणार होते. त्यासाठी सर्वच वृत्तपत्रामंध्ये जाहीराती प्रसिध्द झाल्या. परंतु त्या जाहीरातींमध्ये देखील पालकमंत्र्यांना डावलण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असतांना त्यांनाच डावलण्यात आल्याने सोमवारी कार्यक्रमस्थळी उलटसुलट चर्चा उधाण आले होते.दरम्यान कार्यक्रम सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. परंतु एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांच्या मागे धावत जावे लागल्याचे चित्रही दिसून आले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. परंतु आता या पुलाच्या कामाच्या श्रेयावरुन शिवसेना भाजपामध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. शहराच्या विविध भागात पालकमंत्री आणि भाजपाच्या आमदारांचे फलक लागले आहेत. यामध्ये दोघांनीही आपल्या परीने श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात या पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आता किती प्रयत्न होतात हे पाहणे महत्वाचे असतांना केवळ आमच्यामुळेच हे काम सुरु झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या दोघांनीही पुलासाठी कशाप्रकारे कोणत्या सालापासून पाठपुरावा सुरु केला याचे प्रमाण देखील लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून दिले आहे. असो कोणाच्याही प्रयत्नाने हे काम सुरु झाले असले तरी ते काम वेळेत पूर्ण व्हावे हीच इच्छा समस्त ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेmmrdaएमएमआरडीएtmcठाणे महापालिका