शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

 उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ, पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:49 IST

ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, स्फुट लेखन, संपादन साहित्याच्या अशा विविध प्रकारामध्ये मुशाफिरी करीत असताना शिरीषताई ...

ठळक मुद्देशिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते

ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते. 

कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, स्फुट लेखन, संपादन साहित्याच्या अशा विविध प्रकारामध्ये मुशाफिरी करीत असताना शिरीषताई 'हायकू' सारख्या अतिशय तरल अशा काव्यप्रकारामध्ये मनोमन रमल्या, बहरल्या. हायकू म्हणजे विचार नव्हे, चिंतनही नव्हे तर जिवनाबद्दलची ती सहज प्रतिक्रिया आहे असे अगदी सहजपणे शिरीष ताई आपल्याला हायकू बदल सांगून जातात. अशा चतुरस्त्र, उत्तुंग प्रतिभेच्या कवयित्रींच्या नावाने सहा महिन्यापूर्वी शिवाजीपार्क, दादर येथे शिरीष पै काव्य कट्टा सुरु करण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर, उगवत्या आणि नवे काही करू पाहणाऱ्या आजच्या कवी मंडळींसाठी आपल्या ठाण्यात एक स्वतंत्र मुक्तपीठ सुरु करण्याचा विचार डॉ. सुधीर मोंडकर आणि  विवेक मेहेत्रे यांनी राजेंद्र पै यांच्याकडे मांडला आणि त्यास रितसर मान्यता मिळाल्यावर हा कट्टा सुरु झाला. ठाणे, मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून कविमंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जवळजवळ ४५ कविमित्रांनी आपल्या कविता काव्यकट्ट्यावर पेश केल्या, त्याला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री जोशी यांनी केले तर कविकट्ट्याचे सूत्रसंचालन कवी रामदास खरे यांनी केले. कार्यक्रमाला अनेक नवी-जुनी कविमंडळी, मान्यवर उपस्थित होते. कवयित्री मेघना साने,ज्योती गोसावी, भारती मेहता, तसेच कवी सतीश सोळांकूरकर, विवेक मेहेत्रे, कॅप्टन वैभव दळवी, गीतेश शिंदे, आदित्य दवणे, विकास भावे, अनंत जोशी, विलास पडवळ, मनमोहन रोगे, रवींद्र कारेकर, आदि कविमंडळींनी आपल्या कविता सादर केल्या. राजेंद्र पै यांनी आपल्या आईंच्या आठवणी जागृत केल्या, तसेच आईवरील एक कविताही पेश केली. तेव्हा वातावरण अवघे भारावून गेले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. ठाण्यातील शिरीष पै कट्ट्याचे आयोजन हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी उदवेली बुक्स प्रकाशनातर्फे केले जाणार आहे. पुढील काव्यकट्याची तारीख ही १३ मे २०१८ अशी असणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले. 

 

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई