शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

 उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ, पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:49 IST

ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, स्फुट लेखन, संपादन साहित्याच्या अशा विविध प्रकारामध्ये मुशाफिरी करीत असताना शिरीषताई ...

ठळक मुद्देशिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते

ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते. 

कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, स्फुट लेखन, संपादन साहित्याच्या अशा विविध प्रकारामध्ये मुशाफिरी करीत असताना शिरीषताई 'हायकू' सारख्या अतिशय तरल अशा काव्यप्रकारामध्ये मनोमन रमल्या, बहरल्या. हायकू म्हणजे विचार नव्हे, चिंतनही नव्हे तर जिवनाबद्दलची ती सहज प्रतिक्रिया आहे असे अगदी सहजपणे शिरीष ताई आपल्याला हायकू बदल सांगून जातात. अशा चतुरस्त्र, उत्तुंग प्रतिभेच्या कवयित्रींच्या नावाने सहा महिन्यापूर्वी शिवाजीपार्क, दादर येथे शिरीष पै काव्य कट्टा सुरु करण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर, उगवत्या आणि नवे काही करू पाहणाऱ्या आजच्या कवी मंडळींसाठी आपल्या ठाण्यात एक स्वतंत्र मुक्तपीठ सुरु करण्याचा विचार डॉ. सुधीर मोंडकर आणि  विवेक मेहेत्रे यांनी राजेंद्र पै यांच्याकडे मांडला आणि त्यास रितसर मान्यता मिळाल्यावर हा कट्टा सुरु झाला. ठाणे, मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून कविमंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जवळजवळ ४५ कविमित्रांनी आपल्या कविता काव्यकट्ट्यावर पेश केल्या, त्याला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री जोशी यांनी केले तर कविकट्ट्याचे सूत्रसंचालन कवी रामदास खरे यांनी केले. कार्यक्रमाला अनेक नवी-जुनी कविमंडळी, मान्यवर उपस्थित होते. कवयित्री मेघना साने,ज्योती गोसावी, भारती मेहता, तसेच कवी सतीश सोळांकूरकर, विवेक मेहेत्रे, कॅप्टन वैभव दळवी, गीतेश शिंदे, आदित्य दवणे, विकास भावे, अनंत जोशी, विलास पडवळ, मनमोहन रोगे, रवींद्र कारेकर, आदि कविमंडळींनी आपल्या कविता सादर केल्या. राजेंद्र पै यांनी आपल्या आईंच्या आठवणी जागृत केल्या, तसेच आईवरील एक कविताही पेश केली. तेव्हा वातावरण अवघे भारावून गेले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. ठाण्यातील शिरीष पै कट्ट्याचे आयोजन हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी उदवेली बुक्स प्रकाशनातर्फे केले जाणार आहे. पुढील काव्यकट्याची तारीख ही १३ मे २०१८ अशी असणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले. 

 

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई