शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय असा प्रश्न मतदात्यांनी विचारावा का?, आनंद परांजपे यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: March 13, 2024 16:44 IST

असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुकदर्शक न बनता आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय ? बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे ? मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते ? त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का ? अशाप्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारु शकते. तसेच शिवराळ विजय शिवतारे यांच्याविरोधात ते कोणती कारवाई करणार आहेत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

राज्यात महायुतीच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असतांना स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत बिघाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले.  एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसºयांदा पंतप्रधान बनविण्यासाठी माननीय भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो, आणि त्याही पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.  मुख्यमंत्री  शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. की, निष्ठेची व्याख्या काय ? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मयार्दा बाळगलेली आहे. पण गेले दोन दिवसापासून शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत. परंतु मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना  समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहित नाही. शिंदे यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार ? कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. एकीकडे म्हणायचे पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. एकीकडे म्हणायचे सुनेत्राताई पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे ? असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता का ? की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते त्यांना मतदान करताना ? यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाचाळवीर विजय शिवतारेंसारख्या शिवराळ नेत्यांवर  कोणती कारवाई करणार ? असा सवाल परांजपे यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे