शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

आदर्श लोकशाही मानल्या गेलेल्या अमेरिकेत गोळीबार ही दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:16 IST

राज्यपाल भगतसिंह काेश्यारी : आणीबाणीनंतरच्या जागवल्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  राजकारणात खुर्ची इतकी महत्त्वाची असते की त्या खुर्चीवरून जगभरात आदर्श मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेत गोळीबार झाला हे दुर्दैव आहे. मात्र भारतात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, तेव्हा त्या विरोधात जनतेने आंदोलन केल्यामुळे आपल्या पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागली होती. इतका आदर्श विचार, आदर्श चिंतन भारतातच दिसते, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले.ठाण्यात आयोजित ३५ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे व्यासपीठावर उपस्थित होते. केळकर यांनी या वेळी राज्यपालांचे स्वागत केले. उद्घाटनाच्या सुरुवातीला कोश्यारी यांनी उपस्थितांशी “मला खोकला होतोय, इतकी मराठी मी शिकलोय,” असा मराठीत संवाद साधत आपल्या मिश्कील स्वभावाची चुणूक दाखवली.‘सोने की चिडीया’ म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरूच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला ‘विश्वबंधुत्व’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला. आपल्या देशाला संत, थोर महापुरुष व व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारांवर देश चाललाय हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला इतिहास हेच देशाचे प्रजातंत्र आहे. 

अनेक आक्रमणांनंतरही आपला देश जिवंतच नाही, तर समृद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. ही कोणत्या पक्षाची विचारधारा नाही, तर ती देशाची, जगाची आवश्यकता आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील १८० देश एकत्र येतात ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे, असे म्हणत कोश्यारी यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्येक जण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू, उत्पादन विकणे बंद करणे हे फक्त भारतच करू शकतो, इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्या देशात नाही, असेही कोश्यारी म्हणाले.

nतत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या पुस्तकात पंतप्रधानांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला असल्याचा कोश्यारी यांनी आवर्जून उल्लेख केला.nपूर्वी धान्याची आपल्या देशात आयात व्हायची. आता मात्र धान्य गोदामांमध्ये सडतेय, इतका देश सुजलाम् सुफलाम् आहे. देशाला समृद्ध बनवणे हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ नाही, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका