शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

धक्कादायक ! बदलपुरात शेतकऱ्याला किटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न, शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:10 IST

जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे.

बदलापूर - जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे. या प्रकरणात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (5 ऑक्टोबर) हा सर्व प्रकार घडला. या शेतका-याला उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.  

दत्तू बनकर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळही शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही मिनिटातच ते घरी परत आले. कारण शेतात असताना कुणीतरी त्यांच्या तोंडावर कपडा टाकत जबरदस्तीने त्यांना जमिनीवर पाडले व त्यांना किटकनाशक पाजलं. याप्रकरणी त्यांची पत्नी कमला बनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन बनकर यांच्या शरीरातील किटकनाशक बाहेर काढण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारण होत नसल्यानं पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.  

दरम्यान, या घटनेबाबत दत्तू बनकर यांच्या मुलाला विचारले असता,  जमिनीच्या एका प्रकरणात अंबरनाथ तहसिलदार यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यात निकाल आमच्या बाजूने लागल्याने समोरच्या पक्षाने हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे जमिनीच्या वादातूनच हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून