शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

धक्कादायक! उधारीच्या २० हजारांसाठी भिवंडीत तरुणाचा खून: आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:15 IST

केवळ उसनवारीवर घेतलेल्या २० हजारांसाठी सोहेल पठाण या १८ वर्षीय तरुणाची भिवंडीतील पोगाव गावात रविवारी हत्या झाली होती. या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांमध्ये छडा लावून ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खूनी शाहबाज अन्सारी (२१) याला रविवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांमध्ये केली उकलपोटावर, डोक्यावर आणि गळयावर वार करुन केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दिड महिन्यांपूर्वी उसनवारीवर घेतलेले पैसे वारंवार तगादा लावूनही परत न केल्याच्या रागातून सोहेल पठाण (१८, रा. पोगाव, भिवंडी) याचा चाकूने वार करुन खून करणाऱ्या शाहबाज अन्सारी (२१, रा. शांतीनगर, आझादनगर, भिवंडी) याला अवघ्या १२ तासांमध्येच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली आहे. त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.एकीकडे कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याच संचारबंदीच्या बंदोबस्तामध्ये पोलीस व्यस्त असतांनाच ठाणे ग्रामीणमधील भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोगाव गावाच्या परिसरात तानसा धरणामधून मुंबईकडे जाणाºया जलवाहिनी लगत शस्त्राने गंभीर जखमा झालेल्या अवस्थेतील अनोळखीचा मृतदेह पोलिसांना १९ एप्रिल रोजी मिळाला. एकीकडे कोरोनामुळे अनेक मजूर हे रस्त्यावरुन स्थलांतराच्या प्रयत्नात या खूनामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राम भालसिंग यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार या तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती केली होती. एकीकडे सीसीटीव्हीच्या आधारे तसेच फोटोच्या आधारावर शांतीनगर,निजामपूरा, भिवंडी शहर या भागातील लोकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असतांनाच भिवंडीतील रहमतपुरा भागातील रहिवाशी लालाखान पठाण यांचा मुलगा सोहेलचा तो मृतदेह असून त्याला नशा करण्याचीही सवय होती, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार त्याच्या वडिलांनीही मुलाचा मृतदेह ओळखला. सोहेलची पैशाच्या देवाणघेवाणीतून शाहबाज अन्सारी याच्याबरोबर बाचाबाची झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्याच परिसरातून अवघ्या १२ तासांमध्येच शाहबाजलाही आंधळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोहेलने दीड महिन्यांपूर्वी घेतलेले २० हजार रुपये देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. शिवाय, पैसे देण्याऐवजी त्याने शिवीगाळही केली. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन अन्सारीने सोहेल याला भेटण्यासाठी बोलावून तानसा मुंबई जलवाहिनीच्या जवळच सोहेलच्या पोटावर, डोक्यात आणि गळयावर सपासप वार करुन खून केल्याची कबूली अन्सारीने पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रविण हाबळे, महादेव खोमणे, सुनिल कदम, पोलीस नाईक हनुमान गायकर, अमोल कदम, उमेश ठाकरे, सतीश कोळी, सुहास सोनावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून