शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वाढीव वीजबिलाचा सुमारे पाच लाख ग्राहकांना शॉक

By admin | Updated: December 8, 2015 00:50 IST

आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे

अजित मांडके,  ठाणेआधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. अचनाक बिलात ७०० ते २००० पर्यंतची वाढ कशी झाली असा सवाल आता हे सर्वसामान्य ग्राहक करु लागले आहेत. त्यामुळे हे वाढीव बिल कमी करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे दरवाजे ठोठावण्यास सुरवात केली असून त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे.मागील महिन्यात ज्या ग्राहकाला १२०० रुपये बिल येत होते, त्यांना अचानक या महिन्यात २ हजार पर्यंतचे बिल आले आहे. अशीच परिस्थिती व्यवसायीक ग्राहकांची देखील असून त्यांनाही महावितरणचा शॉक बसला आहे. हे बील आॅक्टोबर महिन्यातील असून, आधीच आॅक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या आणि वारंवार वीज पुरवठा या महिन्यात खंडीत झाल्यानंतरही सर्वसामान्य ग्राहकांच्या हाती अशा प्रकारे वाढीव बिल आल्याने ते चांगलेच संतापले आहेत. या संदर्भात अनेक ग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयात खेपा घालत आहेत. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. आधी बिल भरा, अर्ज करा नंतर तुमच्या बिलाचे बघु अशीही उत्तरे ग्राहकांना मिळत आहेत. परंतु अचानक, आलेल्या वाढीव बिलाचे कारण काय? याचेही धड उत्तर त्यांना मिळत नाही. असे वाढले बिल...महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की इंधनात १ रुपयांची, टेरीफमध्ये जून मध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु त्याचे परिपत्रक उशिराने हाती पडल्याने, जून महिन्याची थकबाकी आणि टॅक्स आॅन सेल लावला गेल्याने एकूण साधारणपणे काही ग्राहकांना ३२ दिवसांचे बिलकाही ग्राहकांना एक महिन्याचे म्हणजेच ३० ऐवजी ३२ दिवसांचे बील गेले आहे. ठेकेदारकडून रेडींग चुकीच्या दिवशी घेतले गेल्यानेच असा प्रकार घडल्याचे महावितरणचे मत आहे. परंतु पुढील महिन्याच्या बिलात २८ दिवसांचे बील येईल असा दावा महावितरण करीत आहे.